दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी -अंगद कांबळे
उद्योगपती अदानी समूहातील कंपनीची २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकी बाबत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी भाजप प्रणित मोदी सरकारला धारेवर धरल्यामुळे मोदी सरकारने सूडबुध्दीने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून मोदी सरकारने एका अर्थाने लोकशाहीची पायमल्ली केली आहे .देशभरातील काँग्रेस पक्ष मोदी सरकारचा निषेध करीत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राज्य प्रतिनिधी डॉ.मुईज शेख यांनी काँग्रेस म्हसळा जनसंपर्क कार्यालयात पत्रकरांजवल वार्तालाप करताना सांगितले.स्वतःला जनतेचे सेवक म्हणऊन घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहूल गांधी यांचे सदस्यत्व रद्द केले नाही तर लोकशाहीची पायमल्ली केल्याचे डॉ.शेख यांनी सांगितले.येत्या १५ एप्रिल ते २० एप्रिल २०२३ दरम्यान जिल्हा स्तरावर ‘जय भारत सत्याग्रह’आंदोलन करणार असल्याचे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सुफियान हलदे यांनी सांगितले. वार्तालाप कार्यक्रमात शहर काँग्रेस अध्यक्ष आशफाक काठेवाडी, म्हसळा शहर युवक अध्यक्ष माजीद सुभेदार,शहर काँग्रेस अध्यक्षा नाजिमा मुकादम,शहर पर्यावरण सेल अध्यक्ष येजाज घरटकर,सुहेल फकिह,सुजाउद्दीन काजी,बशीर दोंदीलकर,जलील काजी आदि मान्यवर उपस्थित होते.