दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा.. तापमाणात
वाढ हॊताच वरंवार तहान लागते त्यामुळे सगळीकडे थंड पाण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचा फ्रिजला मागणी असते, परंतु गरीब लोकांचा फ्रिज कोणत्याही कंपनीत किंवा कोणत्याही मोठया दुकानात मिळत नाही तर तो मातीने बनवलेला असतो आणि तो कुंभाराकडे मिळतो तो गरिबांचा फ्रिज म्हणजे मातीचा माठ होय.
तालुक्यात शेतकरी वर्गाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे त्यांचा आर्थिक परिस्थितीचा विचार करता त्याला उन्हाळ्यात २० ते २५ हजार रुपयाचा फ्रिज घेणे शक्य नसते, परंतु उन्हाळ्याची तहान भगवण्यासाठी माठ त्याला ‘गरीबाचा फ्रिज’ म्हणून संबोधण्यात येणाऱ्या..मातीचा माठांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
मातीचा माठापासून मिळणाऱ्या पाण्याची चवही फ्रिज पासून मिळणाऱ्या पाण्याचा चवीपेक्षा समाधान देणार आहे. यासाठी सर्व सामान्य जनतेकडून माठांच्या खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे मातीच्या माठातील पाणी पिल्याने मन तृप्त झाल्याची अनुभूती होत असते, म्हणून आजही ग्रामीणच काय शहरी भागातही उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी मातीच्या माठाला सर्वाधिक पसंती असते
उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान
अत्यंत उष्ण असते म्हणून पिण्याचे पाणी हे थंड उपलब्ध व्हावे, यासाठी व्यावसायिक कंपन्या नवनवीन सुविधा असलेले फ्रीज बाजारात विक्रीसाठी आणतात; पण खासकरून आजही ग्रामीण भागात कुंभाराने बनविलेले माठ हे आरोग्याच्या दृष्टीने फ्रीजपेक्षा चांगले असल्याने त्यांना पसंती आहे. मातीच्या माठातील पाणी हे फ्रीज आणि स्टीलच्या भांड्यामधील पाण्यापेक्षा कैकपटीने आरोग्यास लाभदायक मानले जाते.
भारतीय संस्कृतीत अगदी पूर्वापारपासून मातीच्या भांड्याना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. फ्रीजमधील पाणी पिल्याने सर्दी,खोकला होणे, दातदुखीचे आजार उद्भवतात. त्या मानाने माठातील नैसर्गिकरित्या थंड झालेले पाणी पिऊन आपले आरोग्य तंदुरुस्त राहते व मन तृप्त झाल्याची अनुभूती होत असते. म्हणून आजही ग्रामीण भागासह शहरातही उन्हाळ्यात माठ खरेदीला प्राधान्य दिले जाते. सध्या लग्नसराईचा हंगामा सुरू असल्याने लग्नघरी माठ व राजणी यांना विशेष महत्त्व असते. म्हणून कुंभाराकडून माठ व राजणी बनवून घेतले जातात. तापमानात वाढ होत असल्याने ग्राहकांकडून माठाची मागणी होत आहे. उन्हाळ्यात चांगला व्यवसाय होईल, अशी आशा कुंभार कारागीर व्यक्त करीत आहेत.