दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
येत्या जयंतीदिनी हे बघाया मिळो / ऐकी होवो अन दृष्ट बेकी पळो सर्व शील श्रद्धावान धम्म उपासक व उपासिका तथा बाल बालिकांनो आपणा सर्वांना कळकळीचेआव्हान करण्यात येते की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठीक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती महोत्सवाची तयारी सुरू आहे . मित्रहो ही जयंती आहे एका महामानवाची, एका बोधिसत्वाची नव्हे एका युगपुरुषाची त्यांनी जगाला अमाप धन ( बौद्धिक ) दिले आहे. त्याची परतफेड किंवा आपले कर्तव्य आपणास पार पडावयाचे आहे. पण कसे ?
बाबासाहेब म्हणायचे ज्या समाजात माझा जन्म झाला आहे त्यांचे ऋण फेडणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. याची ज्याला जाण आहे तो धन्य होय किंवा जो तरुण आपले तारुण्य धम्माच्या कामे खर्च घालतो तो धन्य होय. उपरोक्त संदेश बघून महामानवाचे ध्येय लक्षात येते. परंतु आपण जयंती साजरी करतो ती कशी ? आपलीच मुलं नातवंड की ज्यांचे वर उद्याच्या भावी पिढीचा फार अथवा जबाबदारी आहे परंतु धम्माचा प्रचार प्रसार करताना असे दिसते की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मानव समाजाला बुद्धाच्या विचाराचा जो संदेश दिला तो संदेश वर्षावास कालावधीत ( गुरु पौर्णिमा ) जगभरात वाचल्या जातो . ( भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म )
तीच मुलं वाद्य, डीजे यावर नाचून जयंती साजरी करतात तीच मुलं वर्षभर ना बुद्ध विहारात , ना धम्म ( नीती ) प्रवाहात, ना समाजकार्यात , ना एखाद्या पौर्णिमेला धम्म ध्वजारोहणाला आणि नेमके याच मुलांच्या अंगात फक्त एक दिवसासाठी डॉ. बाबासाहेब दिसतात. हजारो – लाखो रुपये खर्च करून डीजे – बँड बाजे लावून नाचतात. प्रश्न असा निर्माण होतो की यातून समाजाला कोणता संदेश जातो म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही चिंतन करा मनन करा समाजातील पालक – वयोवृद्धांनी मुलांच्या उत्साहात सहभागी होण्यापूर्वी त्यांना समजून सांगा. ऐकत नसेल तर त्यावेळेपर्यंत सात देऊ नका.
कारण २० ते ३० वर्षे या वयोगटातील मुलांचा जर विचार केला तर कदाचित एक पिढी बरबाद झाली , वाया गेली निदान भावी पिढी अशी होऊ नये याकरिता आपण सर्वांनी एकजूट होऊन सावधपणे प्रबोधनात्मक कार्यवुम घ्या. निबंध स्पर्धा, ग्रंथावर प्रश्नोत्तरी , भाषण स्पर्धा, पालीचे वर्ग , एक दिवसीय धम्म प्रशिक्षण इत्यादी विविध उपक्रमांद्वारी जयंती महोत्सव शोभून दिसेल. याद्वारे इतरांच्या लक्षात आणून द्या की आम्ही यापुढे जयंती उत्सव * नाचून * नाही तर * वाचून * करीत आहो. वाचाल तर वाचाल, शिका संघटित व्हा संघर्ष करा बाबासाहेबांचा मूलमंत्र ध्यानी घ्यावा.
इतरांनी बाबासाहेबांच्या जयंतीचा बदल बघितला पाहिजे की ” कोण रे ते “! त्यांची शांतता माय रॅली किती मंगलमय वातावरणात चालली आहे. बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचा पुतळा (symbol of knowledge ) एकच सांगतो की महामानवाची जयंती महामानवांच्या विचाराला शोभेल अशी असावी तरच खऱ्या अर्थाने जयंती दिवसाला अभिवादन ठरेल !
आपला नम्र उपासक
गुलाबराव नेवारे,
साहूर , ता. आष्टी,
जि. वर्धा
( स. प्र. केंद्र म. प्रदेश शाखा साहूर – जामगाव)
मो.९८३४२६२०४०