दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील कीर्तापुर येथील शेतकऱ्यांना मागील अनेक दिवसांपासून शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे येथील 44 शेतकऱ्यांनी या अगोदर तहसीलदार मंठा व उपविभागीय अधिकारी परतूर यांना निवेदन दिले होते.या निवेदनानुसार मंठा तहसीलदार यांनी सुनावणी घेऊन निवेदन करत्यांच्या बाजूने रस्ता खुला करून देण्याचे आदेश भूमी अभिलेख विभागाला दिले होते.
परंतु गैर अर्जदार यांनी उपविभागीय अधिकारी परतूर यांच्याकडे अपील केले होते.त्यात उपविभागीय अधिकाऱ्यांनी गैर अर्जदाराच्या बाजूने निकाल दिला होता.
त्यामुळे रस्ता कायमस्वरूपी खुला करून देण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत दिवेदन देऊन रस्ता खुला करून देण्याची मागणी केली असून रस्ता खुला करून न दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
शेतात जाण्या येण्यासाठी जुना वहीवाटीचा असलेला रस्ता गैर अर्जदार यांनी बंद केलेला असल्याने येथील 44 शेतकऱ्यांना रस्त्याची अडचण झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पडीत पडल्या असल्याने. 11 एप्रिल रोजी किर्तापूर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून या निवेदनात म्हटले आहे की येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता गटनं. 325 मधुन रस्ता अस्तीत्वात होता व सदरील रस्ता गैरअर्जदार यांनी अडविल्यामुळे आम्ही तहसिलदार मंठा यांच्याकडे अर्ज दिला होता.तहसीलदारांनी अर्जावर सुनावणी घेऊन आम्हाला रस्ता खुला करुन देण्यासंदर्भात भूमी अभिलेख विभागाला आदेश देखील दिलेला आहे.तरी देखील अद्याप पर्यत रस्ता खुला करुन देण्यात आलेला नाही.
आज आम्हाला शेतात जाण्याकरिता कायम स्वरुपी रस्ता खुला करून देण्यात यावा कारण एक वर्षापासून आमच्या जमीनी पडीत आसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
दरम्यान तहसीलदार,मंडळ अधिकारी,तलाठी यांनी प्रतेक्ष स्पॉट पाहणी करून पंचनामा केला होता.त्यानुसार अर्जदार शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देऊन शेतकऱ्याच्या मागणीनुसार गट क्र.325 च्या बांदावरून रस्ता उपलब्ध करून देण्यात येतो
सदर बांदाची रुंदी नेमकी किती फूट आहे हे भूमी अभिलेख विभागाने अभिलेख व नियमानुसार निश्चित करावे व त्यानुसार रस्ता उपलब्ध करून द्यावा असे आदेशित केलेले असताना गैर अर्जदार यांनी उपविभागीय अधिकारी परतूर अंच्याकडे अपील दाखल केले व उपविभागीय अधिकारी यांनी गैरअर्जदार शेतकऱ्यांच्या विरोधात निकाल दिल्याने या शेतकऱ्यांचा शेत वहीवाटीचा रस्ता गैर अर्जदार यांनी बंद केलेला आहे.
त्यामुळे या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन रस्ता खुला करून देण्यासाठी निवेदन दिले असून रस्ता खुला करून दिला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर खुशाल ईघारे यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री,महसूल मंत्री यांच्यासह विभागीय आयुक्तांकडे देण्यात आल्या आहेत.
तर या रस्त्या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना भेटून कैफियत मांडनार असल्याचे अर्जदार खुशाल ईघारे यांनी सांगितले आहे.