दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर- मोहन आखाडे
छत्रपती संभाजीनगर
अन्न वाचवा समिती छत्रपती संभाजीनगर तर्फे अन्न नासाडी याबाबत उद्बोधन करण्यात आले.अन्न वाचवा समितीचे अध्यक्ष *श्री अनंत मोताळे* यांनी अन्न नासाडी संदर्भात मार्गदर्शन केले. समिती 2014 पासून सतत या संदर्भात कार्य करीत आहे .
आज आपण पाहतो हौस मौज, थाटमाट ,बडेजावपणा , एकमेकांशी स्पर्धा या ना त्या कारणाने मोठमोठ्या मेजवानी, पार्ट्या यांचे प्रमाण वाढलेले दिसते. याचबरोबर या सर्व ठिकाणी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होताना दिसते. या ठिकाणी होणारी अन्नाची नासाडी बाबत सांख्यिकीय रिपोर्टच सादर करीत असतांना जगभरातील ,देशातील भूखमारी व कुपोषण याबाबत चा अहवालच शिक्षकांसमोर मांडला. अन्न नासाडी बाबत जी विदारक परिस्थिती आणि भयानक सत्य सर्व शिक्षकांसमोर आले तेव्हा त्यांनी अन्न नासाडी होऊ नये याबाबत संकल्प घेतला. *श्री नागेश गव्हले* यांनी सर्वांना संकल्प दिला. त्या संकल्पात जेवताना अन्न ताटात उष्टे न सोडण्याचा बाबतची शपथ सर्वांकडून म्हणून घेतली. “आम्ही सहकुटुंब ताटातून अन्न उष्टे सोडणार नाही. अनावश्यक अन्न ताटात घेणार नाही. आम्ही आमच्या कुटुंबातील लग्नामध्ये मर्यादित पदार्थ करू व अन्न वाया जाणार नाही याचीही काळजी घेऊ. तसेच आम्ही अन्नाच्या प्रत्येक कणाचा सन्मान करू व अन्न वाचवा समितीचे सदस्य बनून या अभियानाचा प्रचार व प्रसार करू .”
तसेच श्री अशोक पोरे यांनी पाणी वाचवा संदर्भात एक कविताच शिक्षकांसमोर सादर केली.ते सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभागातील असल्याने पाण्याचे महत्त्व पटवून दिले.श्री.नागेश गव्हले सर हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी हे अभियान यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
राजाराम प्राथमिक शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बरोबर यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे शिक्षकांनीही सहभाग नोंदविला *यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री नेवरे सर व राजाराम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती काझी शाहिन बेगम* यांनीही या संकल्प निमित्ताने आलेल्या अन्न वाचवा समितीला अन्न नासाडी करण्याबाबत आश्वासित केले व ग्वाही दिली.या कार्यक्रमास शाळेचे शिक्षक श्री.पांडूरंग लव्हाळे सर,सुकदेव देशमुख सर ,समशेर पठाण सर,श्री. जगदीश पाटील सर,श्री. अशोक महाजन सर, श्री योगेश जाधव सर, श्री रविंद्र पाटील सर , श्रीमती वैशाली कुलकर्णी,सौ बबीता पडेवाल, कोतवाल एस. जी. , सौ शेख एन.झेड. , सौ विद्या क्षीरसागर, सौ नीता परदेशी, सौ पौर्णिमा जंगले, सौ प्रीती गर्दे इत्यादी शिक्षकांनीही याबाबत संकल्प केला .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती वैशाली कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. समशेर पठाण यांनी केले .