दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.15 उरळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतली इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी कु. स्वरा सागर कोकडे हिने मंथन परीक्षेत घवघवीत यश संपादन करून न्हावरे केंद्रात प्रथम क्रमांक तर महाराष्ट्रात दहाव्या क्रमांकावर येऊन आपल्या शाळेचे नाव उज्वल केले.तिला मंथन परीक्षेत 150 पैकी 130 मार्क मिळाले.
स्वराचे आई-वडील श्री सागर कोकडे व सौ.सीमा कोकडे दोघेही डॉक्टर असल्याने तिला सातत्याने अभ्यासाची गोडी निर्माण करून प्रोत्साहित केले.
आपल्या गावाचे नाव उज्वल केल्यामुळे सर्व ग्रामस्थांकडून तिचे कौतुक होत आहे.
स्वराला शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक लंघे, वर्गशिक्षिका सौ मंदा धावडे व त्यांचे सर्व शिक्षक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.
या वेळी मुख्याध्यापक श्री अशोक लंघे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की ग्रामीण भागातील मुलांचा पाया मजबूत करण्यासाठी शिक्षकांसह पालकांनीही जबाबदारी घेतली की, आपली मुलेही कुठे कमी पडणार नाहीत. त्यांना फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आपल्या शाळेचे नाव उज्वल केल्यामुळे स्वराचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले.
स्वराला तिचे काका काकी, आजी आजोबा सर्व सुसंस्कृत असल्यामुळे त्यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभत असते.
इ . ४थी मधील २२ विद्यार्थी पैकी १८ विद्यार्थी पास झाले.या मध्ये आदित्य प्रमोद गिरमकर याने 300 पैकी १८० मार्क मिळवित केंद्रात ९वा जिल्ह्यात ५3 वा आणि राज्यात ५५ वा क्रमांक मिळविला आहे .