दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी –
तीन-चार दिवसा दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात हरसद येथील वीज पुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे जनावराच्या पाण्याची गैरसोय होत आहे उन्हाळ्यामुळे विहिरीला पाण्याची सोय नसल्यामुळे पोहऱ्याने शेंदून ही व्यवस्था होऊ शकत नाही जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे कूपनलिका द्वारे शिवाय जनावरांना माणसांना पाणी मिळणे शक्य नाही आणि पाणी काढण्यासाठी विजेची आवश्यकता आहे आणि ती वीज गेल्या पाच दिवसापासून नाही तरी उन्हाळ्याची दखल घेऊन त्वरित संबंधित साहेबांनी पाण्याचा प्रश्न वीज पुरवठा खंडित झालेला सुरळीत करून सोडवावा यासाठी नांदेड दक्षिण काँग्रेस महासचिव सुदर्शन शेंबाळे व त्यांचे सहकारी मित्र ज्ञानेश्वर वारे यांनी महावितरण कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले व त्वरित वीजपुरवठा सुरळीत नाही झाल्यास संवैधानिक पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला .