दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.
जालना मंठा येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेचे उदघाटन नुकतेच पार पडले. यावेळी संभाजीनगर येथील साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह प्रा. डॉ.दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिकराव अतकरे, मंठा शाखेचे नूतन अध्यक्ष प्रा.डॉ.सदाशिव कमळकर ,प्राचार्य डॉ.भारत खंदारे , प्राचार्य अंकुशराव मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
येथील शासकीय विश्रामगृहात सायंकाळी कार्यक्रम पार पडला.याप्रसंगी उदघाटक म्हणून उपस्थित असलेले कौतिकराव ठाले पाटील बोलताना म्हणाले की , वाचकांना डोळस दृष्टी येईल अशा प्रकारचे लेखन साहित्यिकांनी केले पाहिजे. आज वाचन संस्कृती लोप पावत चालली असून शैक्षणिक संस्था देखील ग्रंथालयासाठी पुस्तके खरेदी करताना दिसत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अशा परिस्थितीत लेखकांना लिहिते करण्याचे आणि वाचन संस्कृतीला चालना देण्याचे काम मराठवाडा साहित्य परिषदेने करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंठा शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ.सदाशिव कमळकर यांनी केले. यावेळी त्यांनी मंठा तालुक्यातील साहित्यिक चळवळीचा मागोवा घेतला. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल प्राचार्य.डॉ.भारत खंदारे यांचा आणि माहेश्वरी समाजाच्या वतीने जिल्हा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल महेश भांगडिया यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिषदेचे सचिव प्रा. प्रदीप देशमुख यांनी केले, तर आभार राजीव हजारे यांनी मानले. यावेळी प्रा. अशोक खरात , डॉ.रूपाली सरकटे ,आर.के.राठोड, ज्ञानेश्वर बुलबुले, शिवाजी जाधव, डॉ संतोष मोरे , संजय चव्हाण, श्रीमती एस.पी.राठोड, शरद वायाळ ,सुधाकर शिंदे, छत्रगुण तळेकर ,अनिल पांडे, प्रा. दीपक कुलकर्णी , प्रदीप ईक्कर, डॉ. गोपाल तुपकर , प्रा. सतीश वैद्य, एकनाथ काकडे, काशिनाथ गोंडगे, डॉ. कपिल कमळकर, विष्णु जाधव , बालासाहेब खराबे , विजय गायकवाड, प्रा. परमेश्वर शेळके, डॉ. राजेंद्र गायके आदींची उपस्थिती होती.