दैनिक चालु वार्ता परतूर प्रतिनिधी -नामदेव तौर
परतूर :शासनाच्या शाश्वत विकासाची ध्येय संकल्पना हाती घेऊन, गाव विकासासाठी शासनाच्या संकल्पनेतीन नऊ उद्दिष्टे साध्य करण्याकरिता गावाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन शाश्वत विकास साधण्यासाठी गोळेगाव शिवारात मागील ३५ वर्षांपासून पडीक असलेली सरकारी जमीन शेंद्रिय शेती व पूरक व्यवसायासाठी भाडे पट्यावर देण्यात यावी अशी मागणी गोळेगाव ग्रामपंचायतीने परतूर तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे केली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की,परतूर तालुक्यातील गोळेगाव ग्रामपंचायतीने नुकताच ग्रामसेभेत ठराव घेतला असून गाव शिवारात मागील ३५ वर्षांपासून पडीक असलेली सरकारी जमीन ग्रामपंचायतीने भाडे तत्वावर घेऊन या ठिकाणी गावासाठी शेंद्रिय शेती व पूरक व्यवसाय उभारावा जेणेकरून गोळेगाव ग्रामस्थांचे जीवनमान उंचावेल आणि आरोग्यदायी गाव निर्माण होईल एका सुचकाने सुचविले आणि त्यावर सविस्तर चर्चा करून सर्वानुमते सदरील ठराव मंजूर करण्यात आला.
गट नंबर 107 व 108.मध्ये महाराष्ट्र शासनाची जवळपास 35 एक्कर जमीन मागील 36 वर्षांपासून पडीक आहे सदर जमिनीतुन शासनाला किंवा गावाला कसल्याही प्रकारचे उत्पन्न मिळत नाही त्यामुळे सदर जमीन हि ग्रामपंचायतिला भाडे तत्वावर देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे, जमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने याठिकाणी शाश्वत विकासाच्या नऊ संकल्पना राबविण्यास अधिक सोयीस्कर होणार आहे,शेंद्रिय पध्दतीने धान्य,फळ,भाजीपाला,शेतीपूरक दुग्धव्यवसाय,पशुपालन, कुक्कुटपालन असे उपक्रम लोकसहभागातून राबविले जाऊ शकतात,सध्या शेतकरी उत्पादन वाढीच्या अपेक्षेने रासायनिक औषधी खते याचा वापर करून उत्पादन वाढवतात परंतु याचा वाईट परिणाम मानवी शरीरावर होत असून शेंद्रिय शेती या नाविन्यपूर्ण उपक्रमात शेतीत पिकणार भाजीपाला फळे धान्य हे प्रथम प्राधान्याने ना नफा ना तोटा या पध्दतीने ग्रामस्थांना पुरविण्यात येतील शेळीपालन,गोपालन,गांडूळ खत निर्मिती यासारखे उपक्रम राबविण्यात येऊन रोजगार निर्मिती होऊ शकते,ग्रामपंचायतीने शासकीय विविध योजनेच्या माध्यमातून स्वश्रमदानाने राबविण्याचा मानस आसल्याने परतूर तहसीलदार यांना लेखी निवेदन आणि ठराव सादर करून भाडे तत्वावर जमीन देण्याची मागणी केली आहे निवेदनावर सरपंच सुजाता उद्धव डोळस व ग्रामसेवक एस के शेख यांची स्वाक्षरी आहे
गोळेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने घेतलेला ठराव अतिशय महत्वपूर्ण ठराव असून मागणी करण्यात आलेली सरकारी जमीन उपयोगी यावी व शासनाच्या संकल्पनेतील आरोग्यदायी गाव,गरिबीमुक्त आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव,स्वच्छ आणि हरित गाव,सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव ,जल समृद्ध गाव,बाल स्नेही गाव ,लिंग समभाव पोषक गाव आशा एकूणच नऊ संकल्पना एकाच ठिकाणी राबिवण्याचा मानस असून गावाचा शाश्वत विकास व्हावा याकरिता ग्रामपंचायतीची सरपंच या नात्याने प्रयत्नशील असुन शासनाने सदरील जमीन भाडे तत्वावर द्यावी एक आदर्श आणि समृद्ध गाव करण्याचा निर्धार केला आहे.
श्रीमती सुजाता उद्धव डोळस
सरपंच ग्रामपंचायत गोळेगाव ता.परतूर
जि.जालना