दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
घरावरील पत्रे उडाल्याने
आनेकांचे संसार उघड्यावर…!
देगलूर:देगलुर तालुक्यात मागील पंधरवड्यापासुन वादळी वारे विजांजा गडगडाटासह अवकाळी पावसानं हाहाकार माजवला असुन शेतकरी गरीब कष्टकरी मजुरकाराला आज दुष्काळी जिवन जगण्याची वेळ आली आहे आज दि.३ रोजी दुपारी ३ च्या दरम्यान खुतमापुर येथे अचानक वादळ सोसाट्याचा वारा मेघगर्जनेसह अवकाळी पावसानं हाहाकार माजवला असुन आनेक शेतकऱ्यांच्या घरांची भिंत पडली व घरावरील पत्रे उडाल्यामुळे घरातील लहान मुल वृद्धावस्थेतील लोकांना याचा त्रास झाला आहे तर येथील घरातील संसारोपयोगी साहीत्याचा प्रचंड प्रमाणांत नुकसान झाला असुन गरीब मजुरकार शेतकरी लोकांना संसार उघड्यावर करण्याची वेळ आली आहे तर या घटणेत एक महीला गंभीर जखमी झाली असुन पायाला विस टाके पडले आहेत या घटनेची माहीती गावचे सरपंच व उपसरपंच बालाजी पाटील इंगळे यांना मिळताच घटणास्थळी धाव देऊन तेथील लोकांना धीर दिला आणि शासन दरबारी तलाटी कोंडलवाड यांना संपर्क साधुन घटणेची माहीती दिली या नुकसानग्रस्तात माधव मोहन पांचाळ,सौ.मिनाबाई बाबुराव जोगी, तुळशीदास वामन ठाकूर, शंकर पंढरी ठाकूर, रघुनाथ ज्ञानोबा वलकल्ले, संग्राम वलकल्ले, माधव यादवराव ठाकूर, केरबा यादवराव ठाकूर, हनुमंत यादवराव ठाकूर आदी लोकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले यांना शासनाची त्वरीत मदत मिळवुन देण्यासाठी तलाठी कोंडलवाड यांनी वरीष्ठांना माहीती देऊन उपाययोजना कराव्यात अशी विनवनी बालाजी पाटील इंगळे ,बालाजी चोपडे,वलकल्ले,सुधाकर टोके यांनी केली आहे.