दैनिक चालु वार्ता रायगड म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिन हा स्मृती शताब्दी वर्ष सर्वत्र साजरा करण्यात येत असून आयडियल इंग्लिश हायस्कुल म्हसळा येथे लोकराज्याला विनम्र अभिवादन करण्यात आले या वेळी शाळेचे जेष्ठ शिक्षक नूरमहंद मुलांनी, शारीख सर, दिपक सर झुबीया मॅडम, तेहमिना मॅडम, पत्रकार ए. पी. कांबळे शाळेचे सर्वकर्मचारी उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषद शाळा मेंदडी येथे छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी
महाराष्ट्र शासनाचे आदेशानुसार आज दि. ६ मे रोजी छ.शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ राजिप शाळा मेंदडी येथे साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक सौ गीतांजली भाटकर सौ सायली बीर्जे सौ मयुरी पाटील श्री किशोर मोहिते,पालक श्री राम कांबळे,देवका पायकोळी, विद्यार्थी प्रतिनिधी कु.पूर्वा म्हात्रे व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते
सुरुवातीला विद्यार्थी प्रतिनिधी व पालकांचे यांचे हस्ते छ.शाहु महाराजांचे प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय निकाल पत्रकांचे वाटप करण्यात आले.यानंतर
श्री किशोर मोहिते यांनी आपल्या मनोगतात छ. शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला.त्यांना कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज व त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी दत्तक घेतले शाहू महाराजांचे महाविद्यालयीन शिक्षण राजकोट येथे झाले. २ एप्रिल १८९४ रोजी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी राज्यातील जनतेसाठी विविध योजना आखून जनतेच्या कल्याणाचे कार्य सुरू केले. प्रजेच्या सुखातच राजाचे सुख आहे यावर त्यांचा विश्वास होता त्यांनी संगीत वाद्य, शिकार ,कुस्ती, मल्लखांब, यांसारख्या कलांना प्रोत्साहन दिले. महाराजांनी गुणवंत कारागिरांना उत्तेजन दिले शिक्षणाप्रमाणेच समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. संस्थानातील सार्वजनिक पाणवठे आणि मंदिरे सर्वांसाठी खुली केली. बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले समाजाच्या तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी शाहू महाराजांनी १९१७ ला सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण सुरू केले विद्यार्थ्यांसाठी २२ वस्तीगृह उभारली, खेडोपाडी शाळा उभारल्या, विविध शैक्षणिक संस्थांना पाठबळ दिले, दर्जेदार शिक्षण द्यायचे झाल्यास शिक्षक वर्ग ही तितकाच गुणवान असावा या हेतूने ल शिक्षकांसाठी प्रशिक्षणाची योजना सुरू केली. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध शिष्यवृत्ती जाहीर केल्या हॉस्पिटलमध्ये नर्सिंग अभ्यासक्रमाची सुरुवात करून तो पूर्ण करणाऱ्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या .व्यवसायिक शिक्षणावर भर दिला खेडेगावाचा कारभार व्यवस्थित चालविता यावा यासाठी त्यांनी पाटील व तलाठी शाळा चालू केल्या. तांत्रिक संस्था स्थापन केली संस्थेमध्ये लोहार काम, गवंडी काम, सुतार काम यासारख्या विषयांचे शिक्षण दिले.नोकरीमध्ये आरक्षण देणारे पहिला राजा म्हणुन त्यांची ओळख होती.
१९२० साली झालेल्या माणगाव परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांना दलितांचा नेता म्हणून घोषित केले. अशा थोर नेत्याचा मृत्यू ६ मे १९२२ रोजी झाला .अशा या थोर पुरुषाला कोटी कोटी प्रणाम.