दैनिक चालु वार्ता रिसोड तालुका प्रतिनिधी-आत्माराम जाधव
रिसोड:- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वंचित बहुजन आघाडी च्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा मा.प्रा.अंजलीताई आंबेडकर यांचा कंकरवाडी येथे आज दिनांक ७/०५/२०२३रोजी सर्कल दौरा पार पडला.
यामध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग अग्रस्थानी होता.
या कार्यक्रमात सर्व मतदारांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडी हा केवळ राजकीय पक्ष नसून वंचित समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तयार केलेला मार्ग आहे.
त्याचबरोबर अठरा पगड जातींच्या लोकांना एकत्र आणण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. घराणेशाही संपविली पाहिजे. वंचित बहुजन आघाडी चे सरकार आल्यास के जी. टू पी जी.मोफत शिक्षण देवु. असे आश्वासन त्यांनी दिले.
त्या आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नावं घेतल्याशिवाय कोणताही राजकीय पक्ष सत्ता मिळवू शकत नाही.
माञ मनुवादी विचारांचे पक्ष केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जय जय कार करतात.
माञ त्यांच्या विचारांवर चालत नाहीत. सर्व सामान्य माणसाच्या अधिकारांवर गदा आलेली आहे. केंद्रात असलेले भाजप सरकार सर्व खाजगीकर करत असून नोकऱ्या संपविण्याचा घाट रचत आहेत. भारतीय संविधान धोक्यात आले असुन, आता बहुजन समाजाने सजग रहावे. असे मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जिल्हा, तालुका आणि सर्कल पदाधिकारी उपस्थित होते.