दैनिक चालु वार्ता उमापूर प्रतिनिधी-कृष्णा जाधव
बीड/गेवराई– उमापूर मध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सदरील
उमापूर या गावचा आधीच फारसा विकास नाही.
त्यामध्ये भर उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे उमापूर व उमापूर परिसरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने झालेले नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत.
तरि सर्व नुकसान ग्रस्त शेतकर्यांना तलाठी कार्यालयात जाऊन आपल्या पिकाचे नुकसान झालेले पंचनामे करुन घ्या .
सदरील गावातील तलाठी बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा आधार वाटत आहे. तरी संबंधित कार्यालयाने जातीने लक्ष घालून बळीराजाला या संकटातून वाचवावे अशी मागणी होत आहे.