दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख
==================
निलंगा : दिनांक १०/५/२०२३ रोजी कासारसिरसी येथे निलंगा येथील तहसीलचे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले असून याबाबतचा शासन आदेश जारी झाला असला तरी या निर्णयाला मदनसुरी मंडळातील काही ग्रामपंचायतीने तिव्र विरोध दर्शवला आहे. आमचे कामकाज कासारसिरसीला नव्हे तर निलंग्यालाच हवे अशी मागणी या भागातील ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे तहसिलदाराकडे केली आहे.
औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी निलंगा तालुक्यातील औसा मतदार संघाला असलेली 68 गावचे केंद्र म्हणून कासारसिरशी येथे विजवितरण उपविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग याचे उपविभागीय कार्यालयाला मंजूरी मिळवली आहे. त्यातच एक आणखी एक भर म्हणून कासारसिरसी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी यापूर्वीच हलचाली सुरू होत्या दोन दिवसापूर्वीच याबाबतचा शासन निर्णय निघाला असून औसा विधानसभा मतदार संघाला निलंगा तालुक्यातील जोडलेली ६८ गावासाठी कासारसिरसी येथे अप्पर तहसील मंजूर करण्यात आले आहे मात्र मदनसुरी महसूल मंडळा अंतर्गत येणारे मदनसुरी, रामतीर्थ, धानोरा, बामणी, जेवरी, लिंबाळा, येलमवाडी, जेवरी, सरवडी, एकोजी- मुदगड, नदीहत्तरगा, कोकळगाव, हाडोळी गावाला बाजार पेठ, शाळा, कॉलेज, दवाखाना या दृष्टीकोनातून निलंगा हे महत्वाचे शहर असून कासारसिरशी येथे जरी अप्पर तहसील झाले तरी आमचा शासकीय व्यवहार निलंगा येथील तहसील कार्यालयाकडे ठेवावा ही गावे निलंगा येथेच जोडावी अशी मागणी येथील नागरिककांनी निवेदनाद्वारे केली आहे. दळणवळणासाठी कासारसिरशी पेक्षा निलंगा अंतर जवळ असून कोणत्याही परिस्थितीत मदनसुरी मंडळातील गावे कासार सिरशीला जोडू नये अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. या मंडळातील काही गावाचे ग्रामपंचायतचे ठरावही तहसीलदार अनुप पाटील यांना प्रमुखांनी निवेदनाद्वारे दिले आहेत.
आमदारांनी राजकीय स्वार्थासाठी नागरिकांची मते जाणून न घेता निलंगा तालुक्यातील औसा मतदार संघातील गावे कासारसिरशी येथे जोडन्याचा घाट घातला आहे. त्याला सर्वसामान्य जनतेतून पूर्ण पणे विरोध होत आहे. कोणत्याही परिस्थितीत कासारसिरशी अप्पर तहसील कार्यालयाला आमची गावे जोडू नये अशी मागणी केली आहे.
काही सरपंच आमदाराच्या दबावात
निलंगा सोयीचे असले तरी आमदारांच्या निर्णयाला विरोध कसा करावा म्हणून काही सरपंच दबावात असल्याचेही चित्र दिसत आहे. हा निर्णय दिर्घकाळाचा असून आमदारांच्या दबावात येऊन जर त्यानी लादलेले निर्णय लागू झाले तर गावातील नागरिकांच्या रोशाला देखील सामोरे जावे लागणार आहे.
प्रा. अशोक सूर्यवंशी : सरपंच मदनसुरी
निलंगा कसा सोयीस्कर आहे याबाबत कारण भौगोलिक दृष्ट्या अंतर कमी व्यापारी दृष्टिकोनातून सर्व व्यवहार सुलभ, दळणवळणाची सर्वाधिक सुविधा, शेतकरी मजूर कामगार शैक्षणिक दृष्ट्या व्यापारी मोठी बाजारपेठ असून
राजकीय राजकीय कार्यकर्ते व इतर सोयीचे ठिकाण निलंगा आहे. राजकीय महत्त्वकांक्षीपोटी सामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार असून सामान्यांचा बळी देऊन राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले.