दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी -बालाजी देशमुख
बीड /परळी दि.१६ – भैरवनाथांच्या पावन भूमीतून शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करण्याचा निर्धार भारत राष्ट्र समितीच्या शेतकरी मेळाव्यात करण्यात आला.परळी येथील मांडवा येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या शेतकरी मेळाव्याला शेतकऱ्यांची मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्कर्त्यांनी बीएसआर पक्षात प्रवेश केला.मेळाव्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी राज्य तथा केंद्र सरकार वर हल्लाबोल करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रामुख्याने आवाज उठवण्यासाठी देशात परिचित असलेल्या केसीआर च्या मॉडेल ची आपल्याला गरज आहे असे प्रतिपादन बिएसआर चे नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी शेतकरी मेळाव्यात केले.आपल्याला शेतकऱ्याला मतदार संघाला सुजलाम सुफलाम करायचे आहे.परिस्थिती बदल तुम्हीच करू शकता.भारत राष्ट्र समिती आपल्याला नवीन पर्याय आम्ही दिला आहे आम्हाला बळ द्या.सरकार तुम्हाला फसवू शकते पण त्यांच्या बोलण्यात अडकु शकते पण त्यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका असेही शंकर अण्णा धोंडगे बोलतांना म्हणाले._ *महाराष्ट्रालाही गुजरातचे फेकू मॉडेल मिळाले आहे ते आपल्याला बदलायचे आहे – ॲड माधव जाधव_**
गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस अभिवादन करून ॲड.माधव आप्पा जाधव यांनी भाषणाला सुरुवात केली.मांडवा ही काळ भैरवनाथांची पावन भूमी आहे.मात्र मांडवा पाटीवरून गावात येणारा रस्ताही नाही असा विकास मी पाहिला नाही.काळभैरव हे आंध्रप्रदेश,कर्नाटक, तामिळनाडू अशा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे,गावात येणारा रस्ता दुरुस्त झालाच पाहिजे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून 24 तास म्हणजेच बारा महिन्याचे विजेचे बिल वसूल केले जाते.मात्र फक्त रात्रीच्या वेळेला चार तास वीज पुरवठा केला जातो.ही सरळ सरळ शेतकऱ्यांची फसवणूक आहे.तसेच शेतकरी आत्महत्या कायमच्या बंद करण्यासाठी बी आर एस हा एकमेव पर्याय आहे. तेलंगणात २४ तास मोफत वीज दिली जाते.आमच्या शेतकऱ्याला पूर्ण वेळ वीज मिळालीच पाहिजे.महाराष्ट्रालाही गुजरातचे फेकू मॉडेल मिळाले आहे ते बदलण्यासाठी बीआरएस ला साथ देण्याची साद ॲड माधव जाधव यांनी शेतकऱ्यांना यावेळी घातली.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील शेतकरी घडवायचा असेल तर बीएसआर ला साथ द्या.ऊसाचे पैसे मिळत नाहीत म्हणून शेतकऱ्यांनी कांदा लावला पण सातबारा वर नोंद नसल्याने शेतकऱ्याना सरकार अनुदान देत नाही.स्वतः वर असलेल्या परिस्थिती मुळे शेतकरी जीव देत आहे.ग्रामविकास चा पुरस्कार मिळालेल्या मतदार संघातील रस्त्याचे हाल आहेत.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकवेव उत्तर म्हणजे बिएसआर आहे असे प्रतिपादन कुलदीप करपे यांनी बोलतांना केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत व सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला.ॲड राम चाटे,श्रीकृष्ण चाटे,अमोल राडकर,बीएसआर चे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे आदि मान्यवरांचे भाषण झाले.या मेळाव्यासाठी शेतकरी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.