दै चालु वार्ता वृत्तसेवा /
मुंबई : टीम इंडियातील वादावर BCCI चीं पहिली प्रतिक्रिया टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असताना भारतीय टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये वाद झाला होता. या प्रकरणात भारतीय टीममधील सिनिअर खेळाडूंनी बीसीसीआय सचिव जय शहा यांच्याकडे तक्रार केली होती, बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी विराटची तक्रार करण्यात आल्याच्या वृत्ताला निराधार म्हंटलं आहे. असं वृत्त बुधवारी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं.या सर्व प्रकरणावर आता बीसीसीआयनं मौन सोडलं आहे.
त्याचबरोबर टी२० टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय विराटचा स्वत:चा होता. त्यामध्ये बीसीसीआयची कोणतीही भूमिका नव्हती, हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोन सिनिअर खेळाडूंनी बीसीसीआयकडं विराटची तक्रार केल्याचं वृत्त इंग्रजी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालं होतं.
विराट कोहलीनं १६ सप्टेंबर रोजी टी२० टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला होता.यानंतर विराटनं रोहित शर्माला व्हाईस कॅप्टनपदावरुन हटवण्याची मागणी निवड समितीकडं केल होती, असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं.
धूमल यांनी ङ्कटाईम्स ऑफ इंडियाङ्कशी या विषयावर बोलताना सांगितले की, ङ्ककोणत्याही भारतीय क्रिकेटपटूनं बीसीसीआयकडं लेखी अथवा तोंडी तक्रार केलेली नाही. बीसीसीआय प्रत्येक निराधार बातम्यांवर स्पष्टीकरण देऊ शकत नाही. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप टीममध्ये बदल होणार असल्याचं आम्ही काही ठिकाणी वाचलं. हे कुणी सांगितलं?
बीसीसीआयनं कोणताही निर्णय घेतलेला नाही. विराटनं त्याचा निर्णय स्वत: घेतला होता. त्यानंतर त्यानं बीसीसीआयला कळवलं. त्यामुळे मी बोर्डाच्या वतीनं सांगू इच्छितो की, या प्रकारची कोणतीही तक्रार आलेली नाही ङ्कमीडियातील एका वर्गाची भारतीय क्रिकेटबद्दल सारं काही माहिती आहे, अशी समजूत आहे. त्यामुळे हे समजत पूर्णपणे चुकीचे आहे विराटचा राजीनाम्याचे २४ तास अगोदर कोणालाही कल्पना नव्हती असे ते यावेळी बोलताना म्हणाले.