दैनिक चालु वार्ता अंबाजोगाई प्रतिनिधी-
बीड/अंबाजोगाई-
अंबाजोगाई शहर परिसरात सध्या सूर्य आग ओकू लागला आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणच्या जनमित्रांची धडपड सुरू आहे. उन्हाच्या चटक्यांची पर्वा न करता महावितरणचे कर्मचारी देखभाल व दुरुस्तीची कामे करत आहेत.
अंबाजोगाई शहरात मे महिन्यातल्या तापमानाने ४० अंश सेल्सियसची मर्यादा ओलांडली आहे. सध्या एक मिनिटही बीज पुरवठा खंडीत झाला तर
नागरिकांची अस्वस्थता वाढते. वीजपुरवठा सुरु करण्यासाठी अनेक तक्रारी महावितरणकडे नोंदविल्या जातात. महावितरणही ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत. तक्रार प्राप्त होताच जनमित्र कर्मचारी उन्हाच्या चटक्याचा विचार मनात न आणता केवळ नागरिकांच्या सुविधेसाठी बिघाड शोधण्यास निघतात. उन्हातान्हात लोखंडी खांब तापलेले असतात, तशाही परिस्थितीत हातापायाला चटके सोसत अथक परिश्रमानंतर वीज पुरवठा सुरळीत करतात. रोजच्या कामासोबतच मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीसाठी गावात कोणत्या ना कोणत्या कामासाठी विद्युतवाहीनींवर भर उन्हात महावितरणचे जनमित्र काम करत आहेत.
कर्तव्य तत्पर “वीज सैनिक” अखंडित वीज पुरवठयासाठी महावितरण कर्मचारी हे ऊन,वार, पावसाची तमा न बाळगता कर्तव्यावर असतात. २४ तास वीजपुरवठा अखंडीत ठेवण्यासाठी अधिकारी, कर्मचारी तत्पर असतो.
– श्री सतीश जाधव, सहाय्यक अभियंता, अंबाजोगाई शहर क्रमांक 2
पावसाळ्याच्या अनुषंगाने अंबाजोगाई शहर क्रमांक दोन महावितरणाचे कर्मचारी विविध भागात देखभाल दुरुस्तीचे कामे करीत आहेत. मुख्य विद्युत वाहीन्यांवर अंग भाजणाऱ्या उन्हात काम करीत आहेत. येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांना अखंड वीजपुरवठा व्हावा यासाठी तंत्रज्ञ व बाहय स्त्रोत कर्मचारी कार्यरत आहेत महावितरणच्या अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले.