दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर- मोहन आखाडे
सामाजिक राजकीय जीवनात नेतृत्व निर्माण होत असत काळाबरोबर ते संपुष्टात पण येत असत.लोकांसोबत जोडलेली नाळ अंखडीत मरणोत्तर अमरत्व निर्माण करणारी ठरण हे खुप कमी लोकांच्या नशीबी असत.खडतर संघर्ष आणि दैदिप्यमान इच्छा शक्तितुन दिग्गज घडतो याची प्रचिती महाराष्ट्रासह संबंध देशाला घडविणारे देशासह राज्याच्या राजकारणात एक ठसा उमठवत राखेतून उभा रहणारया फिनिक्स पक्षा सारखं स्वतःच अस्तित्व शुन्यातून निर्माण करत . आमदार, प्रदेश अध्यक्ष, उपमुख्यमंत्री, खासदार केंद्रीय ग्रामविकासमंत्री अशा अनेक पदांना गवसणी घालत यशस्वी प्रवास करताना यशाच्या शिखरावर असताना एक दुर्दैवी क्षण मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्याच्या तोंडाला पानं पुसतो अशी वेळ आली आणि तीन जुनं हा दिवस उजडो नये अशी इच्छा महाराष्ट्र राज्यातील लाखो लोकांना आजही वाटते त्याच काळ रात्रीने लाखो वंचितांचा देव सगळ्यांना सोडुन गेला . गोपीनाथरावजी मुंडे या नावाची ‘जादू’ राज्याचा राजकीय पटलावर सातत्याने आजही कायम असुन लोकांच्या मनात देवत्व निर्माण झालं असुन लोकांच्या हृदयातुन देव्हाऱ्यात जाग निर्माण करत जस जस वेळ लोटती आहे तसं तसं नाव संपुष्टात येत असत पण मुंडेसाहेबांच्या बाबतीत जशी वेळ जातेय तशी लोकप्रियता वाढत चालली आहे आणि आजतर वंचितांचा देव आधार वड म्हणून राज्यातील लाखो लोकांच्या मनात स्वर्गिय मुंडे साहेब यांच्या बदल एक वेगळं स्थान निर्माण झाला आहे हि मुंडे यांनी आयुष्यभर केलेल्या उत्तम कार्याची पावती आहे.राज्यातील लाखो लोक आपलं दैवत म्हणून मुंडे साहेब यांच्या कडे आजही पाहतात .मुंडे या नावाची ताकद आणि जादु राज्यात आजही त्याच ताकदीने कायम आहे. फक्त राजकारणच नाही तर इतर वेगवेगळ्या क्षेत्राला देखिल मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाची भुरळ पडत होती.मग सामाजिक,असो कि सांस्कृतिक विश्वालाही कायम आपल्या आकर्षणाच्या वलयात गुंतवून ठेवणारे साहेब लाखो मनाला भुरळ घालत असत राज्यात कोणत्याही मार्गावर प्रवास कुठेही थांबले तर क्षणात वीस पंचवीस हजाराच्या वर लोकांची गर्दी अगदी दहा मिनिटात होत असे एवढी अफाट आणि अचाट लोकप्रियता आपल्या कार्याने मुंडे साहेब यांनी कमावली होती .साहेब आले… साहेबांनी भाषण केले… अन व्यासपीठ जिंकले नाही अस कधीच झालं नाही पाच पाच सहा तास लोक त्यांचं भाषण ऐकण्यासाठी बसुन वाट पाहायचे.याचा अनुभव त्यांच्या चाहत्यांना नेहमीच यायचा…. 3 जून 2014 रोजी मात्र हा सारा नूरच पालटला आणि त्यामुळे देशाचे, महाराष्ट्राचे आणि प्रामुख्याने जास्तीत जास्त नुकसान बीड जिल्ह्याचे झाले.
महाराष्ट्रासह, देशात अनेक नामवंत, दिग्गज घडविणारे, आपल्या वक्तृत्व शैलीतून व्यासपीठ गाजविणारे तसेच सर्व क्षेत्रात कायम आघाडी घेणारे, यशाचे शिखर गाठणारे, अगदी कितीही छोट्या प्रश्नापासून ते मोठ्या प्रश्नांचे उत्तर जेथे मिळत होते असे नेत्रदीपक नेतृत्व आणि कोणताही प्रश्न सोडवण्याची धमक-दैवी शक्ती प्राप्त असणारे अष्टपैलू नेतृत्व म्हणजे विविध क्षेत्रातील दिग्गज घडविणारे विद्यापीठ म्हणजे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब.
बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र , लोकनेते , ऊसतोड कामगार नेते ते साखर सम्राट महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार कृषी, उद्योग क्षेत्रात स्वकर्तृत्वावर नाव लौकिक मिळवलेले आणि लोकनेता ही उपाधी प्राप्त झालेले एक दैदिप्यमान नेतृत्व म्हणजे नाथ्रा परळी 12 डिसेंबर 1949 रोजी शेतकरी कुटूंबात जन्म झालेले लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे प्राथमिक शिक्षण बिकट परिस्थिती मध्ये पुर्ण झाले .बाल वयात वडीलांचे छात्र हारवले . कठीण परिस्थितीत असताना शिक्षण पुर्ण करत करत विद्यार्थी दशेतच साहेबांनी विविध आंदोलने करून सामाजिक परिवर्तन व विकासाची चळवळ गतिमान करण्यासाठी . प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास ,संघर्ष करून शुन्यातील राजकिय पक्ष सत्तेच्या पटावर पोहचवला .
राजकीय, सामाजिक जीवनात कार्य करत असताना साहेबांकडे अनेक महत्वाची पदे चालत आली. त्यांच्या मुळे त्या पदांना अर्थ मिळाला प्रतिष्ठा मिळाली नावलौकिक झाला . महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विधानसभा विरोधी पक्षनेते पद राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री, उर्जामंत्री वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन , वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे संचालक बीड लोकसभा खासदार लोकलेखा समिती चे अध्यक्ष भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष केंद्रीय ग्रामविकास मंत्री अशी अनेक महत्वाची पदे त्यांनी यशस्वीपणे भूषविली .आपल्या पदाचा व सत्तेचा वापर वंचित,पीडित , बहुजन समाजाच्या दारात सत्तेची गंगा आणण्यासाठी केला तसेच . सामाजिक न्यायची भुमिका घेत लाखो गोरगरीब , सामान्य घटकातील वंचित, बहुजन समाजातील होतकरू, हुशार ,मुलांना साहेबांनी त्यांच्या गुणवत्ते नुसार नोकर्या दिल्या. साहेबांच्या संपर्कात आलेल्या अनेक लोकांच्या जीवनाच सोनं केलं . मराठवाडा हा कायम दुष्काळग्रस्त प्रदेश असल्याने नेहमीच अन्या अत्याचार , गुलामगिरी वाटयला आलेली आणि प्रत्यक्ष अनुभवलेली भोगलेली . मराठवाड्याच्या हिताचा विचार करणारे मोजके नेते होते.विकासाचा अनुशेष इतर विभागाच्या तुलनेत मोठा बाकी होता. विकास कामाच्या बाबत मराठवाड्यावर कायम अन्याय व्हायचा ही बाब मुंडे साहेब यांना नेहमी अस्वस्थ करायची-खटकायची मराठवाड्यातील जनतेत स्वाभिमान निर्माण केला .त्यांना आत्मसन्माने जीवन जगण्याचा मंत्र दिला. महाराष्ट्रातील अनेक आंदोलनाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. अनेक युवकांना प्रवाहात आणले त्यांना दिशा दिली .त्यामुळेच साहेबांना मानणारा मोठा वर्ग समाजात निर्माण झाला . ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती अशा तरूणांचा शोध घेऊन त्यांना सत्तेच्या माध्यमातून प्रवाहात आणले . अनेकांना सत्तापदे देऊन प्रतिष्ठा प्राप्त करून दिली .नेत्यांची पिढी घडविणारे साहेब हे राजकीय, सामाजिक विद्यापीठच होते.
राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी निर्माण केलेला भगवानगड म्हणजे राजकीय शक्तीच अशी ओळख जगभरात करुन दिली. साहेबांची भगवान बाबा यांच्या वरील श्रद्धा एवढी अफाट होती कि बाबांच्या आशिर्वादानेच प्रत्येक निवडणूक ते सहज जिंकत असत आणि भगवान गडावरून मला दिल्ली दिसतेय असं नेहमी म्हणत असतं तसेच भगवानगडाचा दसरा मेळावा हा उत्सव स्वरूपात ऐतिहासिक क्षण ठरायचा अनेक दिग्गज उपस्थित असायचे दसरा मेळाव्याला किमान 5 लाखापेक्षा जास्त गर्दी असायची. साहेब काय बोलणार? साहेबांचे पुढचे राजकीय डावपेच काय? याकडे सर्व देशाचे लक्ष असायचे. भगवानगडाला साहेबांनी विशेष ओळख प्राप्त करुन दिली होती.
आपल्या स्वाभिमानी निडर, बेधडक व स्पष्टवक्ते पणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात साहेबांनी वेगळे स्थान निर्माण केले. महाराष्ट्रात शिवनेरी ते शिवतीर्थ संघर्ष यात्रा काढुन सत्ता परिवर्तन घडवून आणल . राज्याच्या कानाकोपऱ्यात अनेक, प्रचार सभा , त्यांनी गाजवल्या. जिल्हा परिषद ते विधानसभा आणि विधानसभा ते लोकसभा हा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता.जन माणसात प्रचंड आदर व प्रशासनात दरारा होता. दिलेला शब्द पाळणारा हा निष्ठावंत नेता होता. सिंहासनाला थरकाप घडवणारा, हा लढवय्या संघर्ष योध्या होता. लढणे व संघर्ष करणारे ते नितिवंत रणधुरंधर नेते होते. साहेब म्हणजे एक अंगार होते. मात्र आपल्या ताकदीचा उपयोग त्यांनी सर्व सामान्य माणसांच्या विकासासाठी केला. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी बहुजन समाजाच पक्ष अशी भाजपाची प्रतिमा निर्माण केली. जनसामान्य माणसांच्या मनावर राज्य करणारे ते नेते होते . महाराष्ट्रातील गावागावात साहेबांना माणनारा मोठा वर्ग आहे . जिवंतपणीच आख्यायिका आणि अनेकांच्या देवघरातील देव व्हावा हे भाग्य साहेबांना लाभले होते. आजही त्यांच्या कार्याची माहिती अनेकजण भेटल्यावर देतात. साहेबांनी केलेल्या कामाची व मदतीची आठवण करून देतात. लोकनेता हे जनमाणसानींच त्यांना बहाल केलेली उपाधी होती . साहेब हे मराठवाड्याचे, महाराष्ट्राचे भूषण होते , विविध क्षेत्रातील दिग्गज घडविणारे विद्यापीठ म्हणून साहेबांची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल एवढी प्रचंड महती साहेबांची होती . मराठवाड्याच्या मातीला आणि माणसांना अभिमान वाटावा , मस्तक उंचवावं आणि पाठीचा कणा ताठ व्हावा अशा आभाळ उंचीचे नेतृत्व म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब नावाचं शक्तीपीठ सकारात्मक उर्जा केंद्र म्हणजे साहेब
मा . प्रमोद महाजन , मा .विलासराव देशमुख , यांच्या अकाली जाण्याने मराठवाडयाचे फार नुकसान झाले . नेतृत्वाविना मराठवाडा पोरका झाला आहे . अशा अस्थिर काळात साहेब तुमची मराठवाड्याला व महाराष्ट्राला प्रचंड गरज होती . आणि नेमकं याच वेळी नियतिने आपला डाव साधला . आणि महाराष्ट्र पोरका झाला . साहेब तुमचा स्वाभिमानी बाणा , विकासाची तळमळ , प्रचंड संघर्ष आणि लढाऊ बाणा आम्ही कधीही विसरणार नाही. तुमचे विचार व कार्य पुढे घेऊन जाणे हीच तुम्हास श्रद्धांजली ठरेल. साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व
लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक