दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -समाधान कृष्णा कळम
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकूण पिकाच्या 33 टक्के लागवड करावी. परंतु दुर्दैवाने सर्वत्र वनक्षेत्राचे प्रमाण नगण्य आहे. अनेक वर्षांपासून अवैध वृक्षतोड सुरू आहे. प्रत्येक प्रदेशाचे नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आणि आकर्षक आहे. मात्र या निसर्गसौंदर्याला लाकूड माफियांनी ग्रहण लावले आहे.
दै.चालू वार्ता. प्रतिनिधी समाधान कृष्णा कळम वडोद तांगडा,
भोकरदन : पर्यावरणाचे योग्य संतुलन राहण्यासाठी एकूण शेत्रफळाच्या ३३ टक्के अच्छादन असणे आवश्यक आहे. मात्र दुर्दैवाने सगळीकडेच वनक्षेत्राचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सर्रासपणे अवैध वृक्षतोड केली जात आहे. प्रत्येक परिसरातील निसर्गसौंदर्य विलोभनीय आणि आकर्षक आहे. मात्र या निसर्गसौंदर्याला लाकूड माफियांचे ग्रहण लागलेले आहे. भोकरदन तालुक्यातील आडगाव भोंबे,वडोद तांगडा,पारध, धावडा,वालसांवगी, विझोरा,दहिगाव,या ग्रामीण भागात वन परिक्षेत्राच्या हद्दीत येते वनविभाग महसुल विभागाचे प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून लाकूड माफियांकडून वनक्षेत्रातील मौल्यवान झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते. कृषी क्षेत्रातील हजारो झाडांची देखील अवैधरित्या कत्तल केली जाते. परिणामी परिसरातील नंदनवणाचे झपाट्याने वाळवंटीकरण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील वनक्षेत्रावर लाकूड माफियांनी एकप्रकारे डल्लाच मारला आहे. भोकरदन तालुक्यातील थोड्या – मोठे असलेल्या वनक्षेत्रावर देखील लाकूड माफियांची वक्रदृष्टी पडलेली आहे. एकीकडून शासनाकडून दरवर्षी लाखोंच्या संख्येने वृक्षारोपण केले जाते. मात्र दुसरीकडे लाखो झाडांची अवैधरित्या कत्तल केली जात असूनही त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. यामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. सातत्याने पडणारा दुष्काळ, अत्यंल्प पाऊस, पाणी टंचाई, नापिकी यासारखी नैसर्गिक संकटे ही पर्यावरणाचा समतोल बिघडल्याची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे वृक्षारोपण, त्याचे संगोपन आणि संवर्धन करण्याची नितांत गरज आहे. परंतू शासन स्तरावर राबविली जात असतेली शतकोटी वृक्षलागवड मोहीम केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात कमी प्रमाणात असलेले वनक्षेत्र वाढविण्याची गरज आहे. त्याचबरोबर वृक्षतोडीवर कायदेशीर बंदी घालून बेकायदा वृक्षतोड करणार्यावर आणि त्यांच्याशी संगनमत करणारे अधिकारी – कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे लाकूड माफियांनीं अधिकाऱ्यांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध प्रस्थापित केलेले असल्यामुळे अवैध वृक्षतोडीला लगाम घातला जात नाही. पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर वृक्षतोडी मागे असलेले अर्थपूर्ण षडयंत्र ‘ उद्धवस्त करण्याची नितांत गरज आहे.
मौल्यवान झाडे नामशेष!
परिसरातील प्रमुख झाडांमध्ये आंबा, चिंच, बोर, जांभूळ, महारूख, निलगिरी, बांबू अशा अनेक जातीच्या झाडांची बेसुमार लोड केली जाते. अनेक मोठ्या गावांमध्ये लाकूड माफियांच्या टोळ्या तयार झालेल्या आहेत. तोडलेल्य पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकूण पिकाच्या 33 टक्के लागवड करावी. परंतु दुर्दैवाने सर्वत्र वनक्षेत्राचे प्रमाण नगण्य आहे. अनेक वर्षांपासून अवैध वृक्षतोड सुरू आहे. प्रत्येक प्रदेशाचे नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आणि आकर्षक आहे. मात्र या निसर्गसौंदर्याला लाकूड माफियांनी ग्रहण लावले आहे.