दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- शासनाशी संबंधित अनेक बाबीसाठी सर्वसामान्यांच्या गरजा निगडित असतात यात शासनाच्या विविध विभागाकडून मिळणारी प्रमाणपत्रे ही शासकीय योजनेच्या लाभासाठी आवश्यक असतात ही कागदपत्रे मिळवताना नागरिकांची दमछाक होऊ नये त्यांना त्यांची हक्काची प्रमाणपत्रे कागदपत्रे मिळावेत या दृष्टीने आता जनतेला शासनाच्या दारात नाही तर शासन जनतेच्या दारात पोहोचत आहे ही या अभिनव योजनेची फलनिष्पत्ती असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी कंधार डॉक्टर शरद मंडलिक यांनी केले.
उस्मान नगर येथील सिद्धेश्वर मंदिर सभागृहात शासन आपल्या दारी या उपक्रमात ते सिद्धेश्वर मंदिर सभागृहात दि .१६ जून १०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सुरुवातीला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित लोहा – कंधार विधानसभेचे आमदार शामसुंदर शिंदे,प्रशासकीय अधिकारी यांचा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतिने व गावकऱ्यांच्या वतीने शाल,पुष्पहार देवून यथोचित सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात शासन आपल्या दारी ही योजना प्रभाविपणे राबविण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून
उस्माननगर ता.कंधार येथे शासन आपल्या दारी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी मा. डॉ शरद मंडलिक हे उपस्थित होते. तसेच सदरील कार्यक्रमासाठी मा. आमदार श्मासुंदर शिंदे यांनी भेट देऊन उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. राम बोरगावकर तहसीलदार कंधार यांनी केले. त्यांच्या या प्रस्ताविकेत सर्व विभागाची विशद अशी माहीती त्यांनी दिली. त्यानंतर कार्यक्रमाच्या नियोजनाप्रमाणे गटविकास अधिकारी मांजरमकर, गटशिक्षणाधिकारी मा. मधूकर मोरे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मा. चव्हाण सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक कदम, विद्युत महावितरण उपविभागीय अभियंता मा. सत्यवान राऊत तालुका पशुधन अधिकारी भालके तालुका कृषी अधिकारी प्रतिनिधी संजय वारकड, यांनी आपआपल्या विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. तसेच माधव पवार संगायो प्रमुख, लखमावाड पुरवठा विभाग प्रमुख यांनी आपल्या विभागाची माहिती देवून मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मा. उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक यांनी शासन आपल्या दारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन झाल्यावर उपस्थित नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्याच ठिकाणी तात्काळ समस्या सोडवण्यासाठी १२ विभागाचे स्टाॅल लावण्यात आले होते. नागरिकांनी सदरील स्टॉलवर नियुक्त कर्मचारी यांना समस्या सांगितल्या. सदरील कार्यक्रमात खालील स्टॉल लावण्यात आले होते निवडणूक माहिती , संगायो योजना माहिती , घरकुल योजना माहिती , मग्रारोहयो माहिती , पी. एम. किसान माहिती , पुरवठा योजना माहिती , नैसर्गिक आपत्ती माहिती , कृषी विभाग माहिती , शिक्षण विभाग माहिती , पशुधन अधिकारी माहिती , आरोग्य तपासणी , खत बियाणे वाटप माहिती , पोस्ट कर्मचारी , आॅनलाईन प्रमाणपत्र वितरण ,अशापद्धतिने अनेक माहातीचे स्टॉल लावण्यात आले होते. सदरील स्टॉलवर जवळपास १५०० नागरिकांनी भेट देऊन माहिती मिळवली.याच कार्यक्रमात आमदार शामसुंदर शिंदे व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख जयवंतराव काळे शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमासाठी पुरवठा नायब तहसीलदार संतोष कामठेकर, उस्माननगरच्या सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड, उपसरपंच बाशीदभाई शेख , तुकाराम वारकड गुरुजी, सुरेश मामा बास्टे , बालाजी ईसादकर ( शेकाप जिल्हाध्यक्ष), परिसरातील राशन दुकानदार, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी,उस्माननगर चे मंडळाधिकारी शिवदास पटणे, पानपट्टे अविनाश, तलाठी सौ कदम तहसील कार्यालयातील सर्व तलाठी, मंडळाधिकारी, कर्मचारी,अंगणवाडीतील सेविका, मदतनिस,उस्माननगर व परिसरात पुरूष, महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री थोटे मन्भथ भिमराव (समन्वय) यांनी केले व आभार प्रदर्शन उस्माननगर येथील ग्रामसेविका श्रीमती शिंदे डी.ए.यांनी केले.
कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी या उपक्रमांतर्गत विविध शासनाच्या योजनेची माहिती नागरिकांना सांगितली व परिसरामध्ये होत असलेल्या विकास कामासंदर्भात मार्गदर्शन केले परिसरात अनेक योजना राबवत असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.