दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवती सरकारला निवेदित करीत आहेत आज राज्यातील युवकांकडे शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता व काम करण्याची प्रबळ इच्छा शक्ती असून देखील हाताला काम नाही म्हणून अनेक तरुणनांच्या चेहऱ्यावर बेरोजगारीचे नैराश्य दिसून येत आहे.राज्यात शिक्षक भरती होऊन त्यातील अंतिम टप्पा म्हणजे पवित्र पोर्टल नोंदणी सुरु केलेली नाही तरी ति लवकरात लवकर सुरु करावी.तसेच सरकारच्या वित्त विभागाने ८०% म्हणेजच ५५०००पद भरतीसाठी मान्यता दिली असून सदर भरती एकाच टप्प्यात करावी.भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड यादी लावतांना प्रतीक्षा यादी लावावी.
अशी मागणी माधव पाटील सावंत जिल्हाध्यक्ष युवा क्रांती दल नांदेड यांनी केली आहे.