दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: काल दिनांक 17 जून रोजी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा देगलूर शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची भेटी घेऊन पुढील काळातील लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात चर्चा झाली का?
निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय समिकरणे जुळविण्याची तयरी अनेकजणांकडूक सुरु आहे. प्रत्येक इच्छुक आपले कौशल्य पणाला लावून जनसंपर्क वाढवतांना दिसून येत आहेत. लोकसभा आणि विधानसभेचे संभाव्य उमेदवारही या चर्चेत जाहीर होतान दिसत असून नांदेड लोकसभेबरोबरच हिंगोली लोकसभेची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. नांदेड लोकसभेसाठी भाजपाकडून खा. प्रताप पा. चिखलीकर हे दावेदार असले तरी प्रणिताताई देवरे यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसकडून डॉ. मिनलताई खतगावकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर हिंगोलीत शिवसेना शिंदे गट व भाजपाने उमेदवारी युतीचा उमेदवार देण्याची चर्चा सुरु असल्यामुळे खा. हेमंत पाटील हे खासदारकी टिकविण्यासाठी तर रामदास पाटील हे उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसून येत आहे..
मागील लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांचा पराभव होऊन खा. प्रताप पाटील हे विजयी झाले होते. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खा. प्रताप पाटील हे दावेदार असले तरी प्रणिताताई देवरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु असल्याने प्रणिताताई यांना टक्कर देण्यासाठी मिनलताई खतगावकर या काँग्रेसकडून रणांगणात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर माजी आ. वसंतराव चव्हाण यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे.
नांदेड लोकसभे प्रमाणे हिंगोली लोकसभेच्यासंभाव्य उमदेवारांची जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेस मराठा कार्ड वापरण्याची शक्यता असून अंकुश देवसरकर व सचिन नाईक यांची नावे पुढे येत आहेत. तर भाजपा व शिवसेना शिंदे गटाची युती झाल्यास उमेदार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे. खा. हेमंत पाटील यांचा जनसंपर्क कमी होत चालला असला तरी हरीद्र प्रकल्प असो, कयाधु नदीवरील मोठा पुल असो, माहुर गडावरील रोप वे असो किंवा लिगो सारख्या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. हिंगोली मतदारसंघात या निवडणुकीत त्यांना स्वारस्य नसल्याची चर्चा होत असली तरी उमेदवारी निर्माण केला आहे. टिकविण्यासाठी मात्र त्यांची धडपड सुरु आहे. हेही तितकेच खरे आहे. तर भाजपाने उमेदवार दिल्यास तो उमेदवार रामदास पाटील असण्याची चर्चा सुरु आहे. संघ परिवाराशी जोडलेल्या रामदास पाटील यांनी २०१९ पासून राजकीय क्षेत्रात उडी घेतली असून यासाठी त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेचा देखील राजीनामा दिला आहे. ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडू पाहिले जाते. हिंगोलीच नव्हे तर नांदेड जिल्ह्यात त्यांचा संपर्क आहे, लिंगायत समाजाबरोबर
गोलेगावार, मन्नेरवारलु, हटकर, दलित आदी सर्व समाजात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली असून राजकीय क्षेत्रातील त्यांचा वावर परिणामकारक ठरत आहे. भाजपाच्या प्रवास योजनेतून त्यांनी संघटनेतील मोठं नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केली आहे. तरुणांमध्ये त्यांची क्रेझ निर्माण झाली असून हिंगोली मतदारसंघात त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्याचा फायदा लातूर आणि नांदेडमध्येही भाजपाला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, किनवट या ठिकाणी प्रशासकीय सेवा बजावताना त्यांनी सर्वच समाजात एक चाहता वर्ग
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हिंगोली लोकसभेसाठी माजी खा. सुभाष वानखेडे हेच प्रमुख दावेदार राहण्याची शक्यता असली तरी माजी आ. नागेश पा. आष्टीकर यांच्याही नावाची चर्चा सुरु असून समाज माध्यमावर उमेदवारीबाबत शित युद्ध देखील सुरु आहे.
दरम्यान नांदेड – हिंगोली मतदारसंघातील संभाव्य उमेदवार कोण हे निवडणुका जाहीर झाल्यानंतर जाहिर होणार असले तरी चर्चा मात्र चांगल्याच रंगत आहेत.