दै.चालु वार्ताज
जव्हार,प्रतिनिधी
दिपक काकरा
आर्द्रात पावसाची आशा
जव्हार: तालुक्यातील ग्रामीण भागात शेती ह्या मुख्य व्यवसायावरच अवलंबून आहेत.खरीप हंगामातील शेती उत्पन्नाचा वर्षभर वापर करून दैनंदिन जीवन गेल्या अनेक पिढ्यांपासून आजही सुरू आहे.त्यातच पावसाची सुरवात होणाऱ्या मृग नक्षत्रात क्वचितच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या मात्र खोळंबल्या असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.त्यापूर्वी मृगा पूर्वीचे रोहिणी नक्षत्रही कोरडेठाक राहिल्याने शेतकऱ्यांसमोर चिंतेचे ढग दाटले आहेत.आता २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होत आहे.यामध्ये चांगल्या पावसाला सुरुवात होण्याची आशा बळीराजा व्यक्त करत आहे.या नक्षत्राचे वाहन मेंढा आहे.आता या नक्षत्राच्या काळात पाऊस पेरण्यांची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.अलीकडच्या दोन वर्षांत मृग नक्षत्रात पेरण्या सुरू झाल्या होत्या.त्यापूर्वी जुलै अखेर पर्यंत खरिपाच्या पेरण्या तालुक्यात झालेल्या आहेत.
पेरण्यांना उशीर झाल्याने ६० दिवसांच्या कालावधीत होणारे उडदाचे क्षेत्र धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली आहे.त्यामुळे बियाण्यांचे नियोजन कोलमडू नये,यासाठी कृषी विभागाची कसरत होणार आहे.रोहिणीपूर्व अवकाळी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत केली.आता प्रत्यक्ष पेरणी सुरू करायची असताना पाऊस नसल्याने शेतकरी द्विधा मनस्थितीत आहे.त्यातच ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करता येत नसल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे.त्यामुळे यंदाच्या खरिपाच्या पेरण्या उशिरा होण्याची शक्यता आहे.तीनशे हेक्टरमध्ये धूळपेरणी ही पाऊस येणार या आशेने तालुक्यातील शेतकऱ्यांनी धूळपेरणी केलेली आहे.प्रत्यक्षात पावसाचा पत्ता नसल्याने कोरड्यातील पेरण्या उलटण्याची शक्यता असते व यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये.असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
———————
पुरेशा पावसाचा अंदाज घेऊन खरिपाच्या पेरण्या कराव्यात.साधारणतः ६० मिली पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.घरगुती बियाणांची उगवण तपासणी व बीजप्रक्रिया करून पेरणी करावी.
दिपक सोमवंशी,तालुका कृषी अधिकारी,जव्हार