दैनिक चालू वार्ताजि
प्रतिनिधी/ नाशिक
ल्ह्यातील येवला तालुक्यांतील जळगांव-नेऊर येथील रहिवासी आणि भारतीय सैन्य दलातील जवान रतन राजाराम गुळे यांचा मुंबई येथे अश्विनी हॉस्पिटलमध्ये गुरुवारी त्यांची उपचारदरम्यान प्राणज्योत मावळली रतन गुळे यांच्या निधनामुळे जळगांव-नेऊर गावावर शोककळा पसरली.आहे. शुक्रवारी सकाळी रतन गुळे त्यांच्यावर शासकीय इतमामांत मानवंदना देवुन अखेरचा निरोप देण्यात आला.जळगांव-नेऊरहे सैनिकी गाव म्हणून ओळखले जाते. या गावांमध्ये जवळपास पन्नास हुन अधिक जेवण भारतीय सैन्य दलात अतिशय प्रतिकूल परिस्थिंतीवर मात करीत सेवा बचत आहेत. रतन गुळे हे २६ नोव्हेंबर २००७ मुंबई,ठाणे येथे भारतीय सैन्य दरात भरती झाले होते. त्यांनी आटिलरी सेंटर हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जम्मू काश्मीर राजौटी सेक्टर 56 राष्ट्रीय रायफल अच्छल सेक्टर कुपवाडा-लेहतक राजस्थान-जोधपुर नाशिक आदी ठिकाणी कर्तव्य बजावले असून नाशिक येथील युनिटमध्ये कार्यरत असताना दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबई ते उपचारासाठी दरम्यान दाखल करण्यात आले होते. मात्र जवान रतन गुळे यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत त्यांच्या पश्चांत शेतकरी वडील राजाराम पत्नी सुनीता भाऊ गोरख व सुनील असा त्यांचा मोठा परिवार होता. जेवण रतन गुळे हे अतिशय प्रतिकूल परिस्थिंतीवर मात करुन भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. भारतीय सैन्य दलात त्यांचा कालावधी अवघा वर्ष-दीड वर्षाचा राहिला होता. त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसगी नाशिक जिल्हासह येवला तालुक्यांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध संस्थेतील पदाधिकारी यांची उपस्थिती होती. तसेच येवला सैनिक ग्रुप रक्षक आजी-माजी सैनिक संघटना येवला संस्थापक अध्यक्ष ते सर्व पदाधिकारी यांच्यासह जळगांव-नेऊर परिसरातील हजारोंच्या उपस्थिंतीत जवान रतन गुळे यांना अखेरचा निरोप देण्यात आला._*