शेतकऱ्यांमध्ये चिंता : नदी-नालेही कोरडेठाक
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा. दवणे…
जालना, मंठा पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. मात्र, अद्याप तालुक्यात दमदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नदी-नालेही कोरडेठाक असून, शेतकन्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यात सुरुवातीपासून तुरळक पावसाच्या सरी पडल्या. शेतकरी बांधवांनी या पावसावरच पेरण्या केल्या होत्या. रिमझिम पावसामुळे पिकेही उगवली आहेत. मात्र, दमदार पाऊस. झालेला नाही. या भागांत दमदार पावसाअभावी धरण, नदी, नाल्यांत पुरेसा जलसाठा तयार झालेला नाही. या ठिकाणच्या जलसाठ्यात वाढ झाल्यावरच शेत विहिरींतील पाण्याची पातळीदेखील वाढत असते. मात्र, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.