दै.चालु वार्ता
अर्धापूर प्रतिनिधी मन्मथ भुस्से
अर्धापूर-तालुक्यातील लोण,बेलसर,बोरगडवाडी, बारसगाव,या रस्त्याच्या कामामुळे बाजूने नाल्या काढल्या नसल्यामुळे पिकाचे व शेतजमीन खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
लोण,बेलसर,बारसगाव, बोरगडवाडी या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आले असून या रस्त्या कामाच्या साईडने नाल्या काढणे गरजेचे असताना संबंधित गुत्तेदाराने थातूरमातूर मातूर पद्धतीने नालीचे कामे केली असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात अतिवृष्टीचे प्रचंड पाणी शेतात घुसल्याने शेती खरडून जाऊन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे संबंधित गुत्तेदाराला रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्या काढण्यात यावा तसेच शेतीचे झालेले नुकसान संबंधित गुत्तेदाराकडून वसूल करून शेतकऱ्यांना मदत मिळून द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण,
जिल्हाधिकारी नांदेड,तहसीलदार अर्धापूर,उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अर्धापूर यांच्या कडे निवेदनाद्वारे शेतकरी सेना तालुकाप्रमुख रमेश पाटील क्षीरसागर उपतालुकाप्रमुख अशोक डांगे,सोशल मीडियाचे शेख रफिक,उपशहरप्रमुख शिवप्रसाद दाळपुसे यांनी केली आहे.