आमदार जितेश अंतापुरकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले….
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
देगलूर: देगलूर व बिलोली तालुक्यातील मागील काही दिवसांपासून देगलूर तालुक्यातील मौजे खुतमापूर येथील लक्ष्मण संग्राम वल्कले व बिलोली तालुक्यातील मौजे खतगाव येथील शेतकऱ्यांचा महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शॉक लागून मृत्यू झाले पुन्हा एकदा महावितरण कंपनीचा भोंगळा कारभार जनतेसमोर आला असून देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी जनता दरबारामध्ये या महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरून लवकरात लवकर जनहिताचे कार्य करावे अन्यथा कठोर कारवाई करण्यात येतील असे आमदारांनी महावितरण अधिकाऱ्यांना बजावले होते तरीपण हे अधिकारी कोणत्याच लोकप्रतिनिधींना नजुमानता आपले गलथान कारभार चालू ठेवले त्यामुळे या दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे यांच्या संसाराचा कणाच तुटल्यामुळे या शेतकऱ्याच्या कुटूंबाला वीस लाखाची मदत व या कुटुबातील एकाला शासकीय सेवेत समावून घेण्यात यावे. तसेच या घटनेतील चुकीच्या पद्धतीने मृत्यू झाले असून त्या भागतील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का ? असे प्रश्न उपस्थित करून विधानसभेचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी सांगितले की, सद्या देगलूर बिलोली मतदार संघातील नागरिकांची शेतकऱ्यांची व एकच समस्या असून ती म्हणजे यावेळी महावितरण कंपनीची, त्यामुळे अनेक ठिकाणी पोल वाकलेले असून अनेक शेतीमध्ये विद्युत वायर लोंबकाळत असल्यामुळे शेतकरी व नागरिकांचे जीवधोक्यात असल्याचे दिसून येते. तसेच मागील काही वर्षापासून महावितरण कंपनीमध्ये साठ टक्के पदे रिक्त असून ते तात्काळ भरण्यात यावे असेही यावेळी चालू पावसाळी अधिवेशनात मांडले. आमदार जितेश अंतापुरकर यांनी
पावसाळी अधिवेशनात देगलूर बिलोली मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई ,रस्ते, पाणी वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीचे नुकसान असे अनेक मुद्दे उपस्थित करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले व देगलूर बिलोली मतदारसंघातील जनतेला लवकरात लवकर मूलभूत सुविधा देण्यासाठी आर्थिक बजेटमध्ये तरतूद करावी अशी विनंती केली. या दरम्यान मोजे कोकलगाव तालुका देगलूर येथील बालाजी यादव बिरादार यांच्यावर वीज पडून अंग भाजले होते व लक्ष्मण संग्राम वल्कले यांचे शॉक लागून निधन झालेले होते यांना सानुगृह अनुदानाचा चेक आमदार जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते देण्यात आले.