दै.चालू वार्ता
प्रतिनिधी,उमापूर कृष्णा जाधव
गेवराई – उमापूर,
सतगूरू सेवालाल महाराज,वसंतराव नाईक,सामत दादा,हामूलाल महाराज बाबासाहेब आंबेडकर,जिजाऊ-शिवरायांचे नाव घेऊन प्रबोधनाची चळवळ समाजामध्ये ठासून सांगणे समाजासाठी आहोरात्र लढणे हेच माझ कार्य राहील खरा इतीहास लोकांनपर्यंत घेवून जाणारा मी एक कार्यकर्ता आहे… प्रबोधनपर पुस्तकं वाचून पेटलेला मी एक कार्यकर्ता आहे, ज्यावेळेस महापुरुषांची बदनामी होईल त्यावेळेस पेटून उठतो आणी वूठणार…
राष्ट्रीय बंजारा परीषद एक आग्या-मोहोळ आहे….
चळवळ म्हटलं की विचारधारा सर्वोच्च असते. महापुरुषांच्या रूपात जुन्या लोकांनी दिलेले चांगले विचार लोकांमध्ये रुजवणे आणि ते चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाणे हेच कार्यकर्ता म्हणून सर्वांचे कर्तव्य आहे. समाज जागृत व्हावा, लोकांचे प्रबोधन व्हावे… हा त्यामागील प्रामाणिक विचार असतो. प्रबोधनाच्या चळवळीत कुणीही मोठा किंवा लहान नसतो, तो समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य मातीत घालतात. यातूनच हाडाचा कार्यकर्ता निर्माण होतो. एक एक माणूस आपल्या सोबत यावा, सोबत चळवळीत काम करावं म्हणून काही कार्यकर्ते संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी घालवतात. अशाच लोकांकडे राजकीय सत्ता नसते. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजाचा विकास किंवा समाजाचं भलं व्हावं म्हणून ते काम करत असतात. महापुरुषांनी दिलेले विचार तर क्रांतिकारी आहेत. परंतु समाजानं जर ते स्विकारले तर परत एकदा सामाजिक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आम्ही लांबून लांबून सगळं बघतो, त्यामुळे आम्हाला काहीही देणघेणं नसतं. आम्ही पेटून उठत नाही, संघर्ष करत नाही, व्यवस्थेच्या विरोधात लढा देत नाही. फक्त लांबून तमाशा बघतो आणि याचाच फायदा घेऊन इथली बधीर झालेली राजकीय लाचार व्यवस्था आमचा फक्त ‘युज अँड थ्रो…’ करते. तरीही आम्ही शांत असतो. सामाजिक चळवळीत वैचारिक क्रांती घडवण्यासाठी आमचा जन्म झाला आहे असे आम्हाला काम करताना वाटतं. परंतु आमची वैचारिक क्रांती झाली तरी सामाजिक आणि राजकीय क्रांती करण्यासाठी आम्ही फक्त दुसऱ्याच्या सतरंज्या उचलण्यात किंवा वेट बिगारी करण्यात धन्यता मानतो. आम्ही फक्त त्यांना आमच्या विचाराचे म्हणतो, ते मात्र आमचा फक्त वापर करतात ते आम्हाला कधीच कळत नाही. मग गैरसमज कसला. लढणारी यंत्रणा कधीच गैरसमजात जगत नसते. भाकड चर्चा काही कामाची नसते,
उपाशीपोटी क्रांती होत नसते….
व्यवस्थेची चिकित्सा हा आमचा विश्वास आहे. खरं सत्य हेच आम्ही स्वीकारणार आणि इतरांना सांगणार. म्हणून तर लाखो कार्यकर्ते घडले, हजारो कार्यकर्ते जाहीर बोलायला लागले हीच वैचारिक क्रांती असते. म्हणून जग जिंकण्याची ताकद आम्हाला कीसनभाऊ राठोड अणी वीलास भाऊ राठोड साहेबांनी दिलेली आहे. तीच क्रांतीची मशाल समाजामध्ये पेटवल्या शिवाय शांत बसणार नाही,
चर्चा लढणाऱ्यांची होते… बघणार्यांची नाही, हेच लक्षात ठेऊन आपण सोबत राहू…..
यूवा वक्ता – गोर राहुल पवार
राष्ट्रीय बंजारा परीषद, प्रदेश प्रवक्ता..!