दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : माळीपुरा,द्वारकाचौक सुर्जी येथील रहिवासी अविवाहित प्रियेश विलासराव हाडोळे वय २७ याचा दि.१७ ऑक्टोबर रोजी अकोट वरून अंजनगाव कडे येत असतांना भंडारज गावानजीक अपघात झाला होता.
अपघात एवढा भयावह झाला की,त्या अपघातात प्रियेशच्या डोक्याला,छातीला व पायाला गंभीर मार बसला होता.तेथून त्याला अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी परिस्थिती बघता त्याला अमरावती येथे रेफर केले होते.अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख रुग्णालय येथे त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले.परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी ऑपरेशन सुध्दा केल्याचे समजले.उपचाराच्या ४८ तासानंतर दि.१९ रोजी दुपारी ३ वाजता प्रियेशचे दुखःद निधन झाले.या घटनेने अंजनगाव सुर्जी परिसरात शोककळा पसरली असून त्याचे पार्थिवावर दि.२० रोजी हिंदु स्मशान भूमी अंजनगाव सुर्जी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याचे पश्चात आई,वडील आहेत.