महिलांचा हंडा आक्रोश सरपंच मात्र गैरहजर…
रत्नागिरी -समिर शिरवडकर
राजापूर मधील ग्रामपंचायत नाटे मध्ये ११ प्रभाग असुन भर पावसात नाटे बाजारपेठ, आणि नजाब नगर हे दोन प्रभाग चार महिण्यापासून पाणी पासून वंचित आहेत, वारंवार ग्रामपंचायत विचारणा करून सुद्धा त्यात काहीही फरक पडत नव्हता ,शेवटी त्रस्त होउन आज महिलांनि हंडा मोर्चा थेट ग्रामपंचायत कार्यलाय मध्ये नेउन सरकारला जाब विचारणा करण्यासाठी हजारो महिला आणि पुरुष ग्रामपंचायत नाटे मध्ये ग्रामसेवक राजेंद्र प्रसाद राऊत याना घेराव घातला असून,मात्र लोकनियुक्त सरपंच संदीप बंदकर हे गैरहजर आहेत,वारंवार फोन करून सुद्धा फोन उचलत नाहीत. लोकांचा राग अनावर झाला आहे.कारण पाणी हे महिलांचा जीव की प्राण आहे.आम्हला न्याय द्या अन्यथा आम्ही जागेवरून हलणार नाही.असा पवित्रा घेत ग्रामपंचायत कार्यलायत ठिय्या धरला आहे.
राजापूर गटविकास अधिकारी यांच्या शी पत्रकार आणि ग्रामस्थ याची चर्चा होऊन संमधीत सरपंच घटनास्थळी उपस्थित राहून तुम्हाला उत्तर देतील असं सांगितलं.