दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा )
तालुक्यातील मौजे.माळेगावं येथील शेतकरी सीताराम भाऊ जाधव यांची दहिफळ खंदारे शिवारातील गट नंबर ७०८ मधील दीड एकर व गट नंबर ७०५मधीलअडीच एकर गोळा करून ठेवलेली सोयाबीन गंजी जळुन खाक झाली असुन अंदाजे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सविस्तर माहितीस्तव आज दि.२७आक्टोबर शुक्रवार रोजी सायं ६ वाजता शेतकरी सीताराम जाधव यांनी चार एकर शेतामधील सोयाबीन काढून गंजी लावुन ताडपत्री झाकुण झाकून ठेवली होती जवळच असलेल्या आपल्याला घरी गेले आणि चहापाणी घेत अंगणात बसले असता ६:४५वाजता शेतात जाळ दिसल्याने वाजता त्यांचा मुलगा अमोल पुतण्या रवींद्र जाधव यांनी शेताकडे धाव घेतली
यांना सोयाबीन गंज गोळा केलेल्या शेतातुन आगीचे लोळ दिसले. पटनास्थळी सोयाबीनच्या गंजीने पेट घेतलेला दिसुन आला. आजुबाजुला कुठेही विजेची तारेचा संबंध नसल्याने जाणिवपूर्वक सोयाबीन पेटवुन दिल्याचा संशय व्यक्त केला व्हिडिओ व फोटोसह मंठा पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे…