खऱ्याच खोटं अन् पहाणीत लपलय मोठं
दैनिक चालु वार्ता
वैजापूर ता.प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापूर(छत्रपती संभाजीनगर) – वैजापूर तालूक्यात यंदा पावसाने जुन,जूलै व आँगस्टमधे व सलग ४५ दिवसांची दडी मारली होती परिणामी खरीप हंगामातील कापूस, मका, सोयाबीन,भुईमुग, मुग ही पीके कोमात गेल्यामूळे ऊत्पनात मोठी घट झाली आहेत. त्यामुळं कर्ज काढून शेती करणारा बळीराजा या हंगामात चांगल्याच अडचणीत सापडला आहे पावसाची सरासरी पाहता तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे.२१दिवसापेक्षा अधिक दिवस पावसाचा खंड पडलेल्या निकषात वैजापूर तालुक्यातील वैजापूर,महालगाव,बाबतरा,जानेफळ,खंडाळा,गारज,बोरसर,घायगाव,शिऊर,नागमठाण ही दहा महसूल मंडळे पात्र जिल्हाधिकार्यांनी ठरल्यामुळे शेतकन्यांना २५ टक्के अग्रिम रक्कम मंजूर करण्याचा प्रस्ताव विमा कंपनीकडे कारवाईसाठी पाठवला होता. मात्र, विमा कंपनीने जिल्हा प्रशासनाकडे दहा महसूल मंडळातील परिस्थितीचा विमा कंपनीतील अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याची मागणी केली होती.व ६ सप्टेंबर रोजी चोलामंडल विमा नुकसान विभागाचे महाराष्ट्र हेड मनोज सत्यपदी,हरिष तिवारी व स्थानिक विमा अधिकारी यांच्या पथकाने शेतातील पिकांची पाहणी करून छायाचित्रे काढली होती पाहणी दौऱ्यात उपविभागीय कृषीअधिकारी अशोक आढाव, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, माजी सभापती बाबासाहेब जगताप, बाजार समितीचे संचालक गणेश इंगळे, प्रशांत त्रिभुवन व कृषिसहायकांचा पथकासोबत समावेश होता वैजापूर तालुक्यातील दहा महसूल मंडळांत पावसाअभावी ८७ हजार ७८४ हेक्टर क्षेत्रातील कापूस, मका, सोयाबीन या नगदी पिकांचे उत्पादनात ६० टक्क्यापेक्षा अधिक प्रमाणात घट येणार असल्याने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी चोलामंडलम पीक विमा कंपनीला ६९ हजार २४७ शेतकन्यांच्या बँक खात्यात महिनाभरात २५ टक्के अग्रिम रक्कम देण्याचे आदेश दिले होते त्यामूळे शेतकऱ्यांना दूष्काळ जाहीर झालाय व आपल्याला पिकविमा मिळनार आहेत ही चर्चा सर्वत्र होती पन सैटेलाइट इमेजवरुन दुष्काळात वैजापूर तालुका नाही हे पाहून तालूक्यामधिल शेतकरी संताप व्यक्त करत आहेत…