दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सोलापूर (माढा):मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मागणीसाठी २६ जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर होणाऱ्या उपोषणा मध्ये सहभागी होण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील हजारो मराठा बांधव मुंबई येथे पायी चालत निघाले आहेत.याच बांधवांचे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या नरसिंह प्रतिष्ठान नरसिंहनगर टेंभुर्णी यांच्या वतीने टेंभुर्णी येथे स्वागत करून, प्रतिष्ठानच्या वतीने मोफत पाणी, चहा व नाष्ट्याची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज स्मारक टेंभुर्णी या ठिकाणी करण्यात आली होती. यावेळी हजारो मराठा बांधवांनी या अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन मुंबईकडे वाटचाल केली व नरसिंह प्रतिष्ठानने केलेल्या कार्याचे कौतुक केरून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी मोठ्या संख्येने नरसिंह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.