दै.चालू वार्ता
प्रतिनिधी,उमापूर कृष्णा जाधव
गेवराई, उमापूर,उमापूर
मध्ये समाज आणि शिक्षण प्रेमी श्री ज्ञानेश्वर शिवाजी पिंगळे उर्फ माऊली यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेला दिल्या एक आगळ्यावेगळ्या शुभेच्छा… उमापूर जिल्हा परिषद शाळेच्या गेट समोर अनेक दिवसापासून अस्वच्छतेने कळस गाठला होता. त्यामध्ये खोके ,कचरा, दारूच्या बाटल्या दगड विटा कोंबड्याचे पखाडे आणि पहाटे उठणाऱ्या मानवाची विष्ठा त्याच्या काही बातम्या वर्तमानपत्रात आणि व्हाट्सअप फेसबुक ग्रुप वर प्रसारित झाल्या होत्या पण त्याची दखल कुणीही घेतली नाही.
दै.चालू वार्ता या वृत्तपत्राच्या माध्यमातून व लाइव चैनल च्या माध्यमातून आज पर्यंत बऱ्याच वेळेस हे प्रसारित झाले होते.खूप वेळी वृत्तपत्रातून बातम्या लावूनही हे काम होत नव्हते पणश्री पिंगळे यांनी स्वखर्चून हे काम पूर्ण्ण केले. प्रसारित होत राहिले चिकटून आत पोषण आहाराच्या खोल्या आहेत तिथे विद्यार्थी भोजन करतात हे चुकीचे आहे पण कुणी लक्ष देत नाही कुठेतरी मनाला बोचत होते पण समाजसेवी माऊली पिंगळे यांनी 26 जानेवारी च्या दिवशी गणेश गाभुड यांच्या प्रेरणेतून व लेवल ट्रॅक्टर रामप्रसाद जाधव यांच्या मदतीने 26 जानेवारीच्या पहाटे साडेचार वाजता लेवल ट्रॅक्टरने सर्व कचरा घाण लोटून देऊन, उरलेले बारीक दगड बाटल्या मटेरियल हाताने फेकून दिले.आणि पहाटे साडेचार ते सहा कोणी शौचास बसु नये म्हणून राखण केली आणि स्वच्छ भारत अभियान काय असते हे गावकऱ्यांना दाखवून दिले. त्यासाठी टि.व्ही.वर पाहून वृत्तमानपत्रामध्ये वाचुन जमत नसते तर आपले हात झिजवावे लागतात आणि थोडा त्याग करावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे केलेले श्रमदान.आणी या कामाची शाळेने वाच्यता केल्यानंतर सुधीर औटी यांनी कार्यसम्राट आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छतेसाठी पाच हजार रुपये रोख दिले.कुठेतरी माझ्या प्रयत्नाला यश आले.ईवलेसे रोप लावीयले द्वारी त्याचा वेलु गेला गगनावरी.