दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
डॉ. कृष्णा अंभुरे, विषय विशेषज्ञ , पिक संरक्षण
श्री. प्रभुदास उडतेवार – YP II
श्री.. बालाजी चंदापुरे – YP I
कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी जि. नांदेड
नांदेड/सगरोळी:-फरदड म्हणजे काय
फरदड कापूस म्हणजे कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर पाणी (सिंचन) देऊन पुन्हा कापूस पीक घेतले जाते. फरदड पिकामध्ये जोमदार उत्पादन मिळण्यासाठी पाणी, खते, कीटकनाशके यांचा वापर केला जातो. या पध्दतीमुळे कापूस पीक शेतामध्ये मार्च महिन्यानंतरही राहते. कपाशी वेचणीनंतर रब्बी पश्चात हंगामामध्ये नवीन पीक घेण्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते. त्यामुळे मशागत, पेरणी आणि बियाणे अशा बाबींवरील खर्च वाढतो. हा खर्च टाळण्यासाठी खरीप हंगामध्ये लागवड झालेल्या कापूस पिकापासूनच फरदड कापसाचे वाढीव उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. प्रति एकर कापूस उत्पादकता वाढते. या कारणामुळे फरदड पीक घेण्याची पध्दत शेतकऱ्यांना फायद्याची वाटते. मात्र, या पध्दतीमुळे शेतीमध्ये दीर्घकाळ पीक राहिल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. म्हणून कोणत्याही परीस्थितीत शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये. कापसाची वेचणी झाल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये दिवस लहान होत जाऊन रात्रीचा काळ वाढत जातो. त्याचवरोबर रात्रीच्या तापमानात घट होते. ही परिस्थिती गुलाबी बोंडअळीच्या पतंगांना अनुकूल असते. कापसाची फरदड घेतल्यास दीर्घ कालावधीच्या पीकावर शेंदरी बोंडअळीच्या जास्त. पिढ्या पूर्ण होत असल्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी सतत पोषक वातावरण निर्माण होते. नोव्हेंबर महिण्याच्या नंतर पाणी देवून एप्रिल-मे पर्यंत ठेवल्यामुळे कपाशीचे पीक शेतामध्ये जवळपास वर्षभर होत आहे. हंगामानंतर कपाशीला चांगला भाव येत असल्याने शेतकरी उशिरापर्यंत ठेवण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा मुख्यतः हिवाळ्यात ऑक्टोबर शेवटी ते नोव्हेंबरमध्ये होता शेंदरी बोडअळी डिसेंबर महिण्यात कोष अवस्थेत कपाशीच्या पर्ह्याट्या किंवा वाळलेल्या नख्यांमध्ये निद्रावस्थेत जाते. नोव्हेंबर नंतर पीक ठेवल्याने शेंदरी बोंडअळीच्या वाढीसाठी कपाशीची बोंडे सतत उपलब्ध होत असल्याने तिच्या वाढीच्या अवस्थेस आणखी चालना मिळत असल्याने बीटी जनुकाविषयी प्रतिकारकता निर्माण झाली आहे. प्रदीर्घ काळापर्यंत कच्च्या कापसाची जिनींगमध्ये आणि व्यापारी संकुलात साठवण केल्याने गुलाबी (शंदरी) बोंडअळीचा प्रादुभांव आगामी हंगामात येण्यासाठी पोषक वातावरण तयार होते.
फरदड घेतल्यामुळे होणारे दुष्परिणाम…
1. फरदड कपाशीमध्ये लागणाऱ्या बोंडाचे पोषण सुयोग्य न झाल्यामुळे धाग्यांची लांबी कमी होते. त्याचप्रमाणे धाग्याची मजबूती आणि रुईचा उतारा घटतो. कापसाची प्रत घटते. त्यामुळे कापसाला बाजार भाव कमी मिळतो.
2. फरदड कापूस पिकावर येणाऱ्या अळ्यांना हंगामा नंतर तयार खाद्य उपलब्ध झाल्यामुळे गुलावी आणि हिरवी बांडअळी यांच्या पुढील पिढधाना खाद्य उपलब्ध होते.
3.फरदड पीकापासून वाढीव उत्पादन मिळण्याच्या लालसेमुळे ठेवलेल्या पीकामध्ये हिरवी बोंडे उपलब्ध होतात. त्यामुळे त्यांच्या जीवनक्रमांच्या संख्येत कमी कालावधीत वाढ होते आणि पुढील हंगामात त्यांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.
4. कापसाची फरदड घेतल्यास कोड व रोगांचा प्रार्दुभाव वाढण्याचो शक्यता असते.
5. खरीप हंगामातील पिकावर मावा किडीचा प्रार्दुभाव झाल्यानंतर त्यावर निओनिकोटिनॉईड वर्गातील किटकनाशकांचा वापर करण्यात येतो. फरदड पीकावर रसशोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी या किटकनाशकांचा काहीवेळा पुन्हा वापर करण्यात येतो. त्यामुळे या वर्गातील किटकनाशकांची परिणामकारकता कमी होत आहे.
6. पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव कापूस हंगामाच्या शेवटी (आक्टोंबर महिन्यात) होतो. या परिस्थितीमध्ये कापसाची फरदड घेतल्यास पांढरी माशी किडीचे प्रमाण वाढून पुढील हंगामामध्ये या किडीचा प्रादुर्भाव लवकर होण्याची शक्यता असते.
7. फरदड कापूस घेतल्यामुळे त्या जमिनीमध्ये फयुजारियम मर, व्हर्टीसिलीयम, मूळ सडणे इ. मृदाजन्य रोगकारक बुरशीचा प्रसार आणि फैलाव होऊ शकतो.
8. फरदड कापूस पिक शेताबाहेर काढण्याच्या वेळी माती कडक झालेली असते. त्यामुळे झाडे उपटून काढण्यासाठी अधिक प्रमाणात मजूर, वेळ, श्रम आणि पैसा खर्च होतो.
हंगामानंतर घ्यावयाची खबरदारी…
कामगंध सापळया (फेरोमोन ट्रॅप्स) द्वारे नर पतंग मोठ्या प्रमाणात गोळा करून नष्ट करावे, आवश्यकतेनुसार सापळ्यांतील गंधगोळी (ल्युर) ३० ते ४५ दिवसानी बदलावे.
कापसाची साठवणूक केलेल्या ठिकाणी कामगंध सापळे तसेच प्रकाश सापळे लावावे.
कापूस पीकाची वेचणी झाल्यानंतर डिसेंबर महिण्यात पीकाच्या पन्हाट्या काढून नष्ट कराव्या.
कापसाच्या पर्हट्या गोळा करून त्याच्चे बांधावर ढीग करू नये.उपलब्धतेनुसार ट्रक्टरचलित यंत्राद्वारे पर्हाटीचा चुरा करून त्याचे सेंदीय खत तयार करावे
पीकातील न फुटलेली व किडकी बोंडे तसेच पालापाचोळा नष्ट करावा.
पीक काढल्यानंतर त्वरीत खोल नांगरणी करावी म्हणजे जमिन उन्हात तापल्यामुळे कोष नष्ट होतील.
येणाऱ्या हंगामातील सुरूवातीच्या काळात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग, इतर स्वयंसेवी संस्था यांच्या सल्ल्याने उपाययोजना अवलंबिल्या आणि सर्वाच्यां या अथक प्रयत्नांमुळे आपण बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी करू शकलो. परंतु काही तुरळक शेतकऱ्यांनी जरी कापसाची फरदड घेतली तर अळीचे जोवनचक्र पूर्ण करण्यासाठी खाद्य व वाढीव कालावधी मिळेल. परिणामी त्यामुळे पुढील हंगामात गुलाबो बोंडअळीचे प्रमाण वाढून सर्वाना नुकसान होऊ शकते. म्हणून चालू हंगामात शेतकऱ्यांनी कापसाची फरदड घेण्याचा मोह टाळावा.