दै.चालु वार्ता
उस्माननगर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- उस्माननगर ता.कंधार येथील त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा,अभ्यासातील ताणतणाव कमी व्हावा म्हणून विविध कला गुणांनाचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि.२३ फेब्रुवारी २०२४ रोज शुक्रवार या दिवशी करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिराढोण नगरीचे सरपंच तथा भिमाशंकर मा.व.उच्च मा.वि.शिराढोण येथील प्राचार्य श्री खुशालराव पाटील पांडागळे होते तर उद्घाटक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख तथा जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा शिराढोण येथील मुख्याध्यापक श्री जयवंतराव काळे तर प्रमुख पाहूने म्हणून उस्माननगर येथील सरपंच सौ.शोभाताई शेषेराव पाटील काळम, माजी सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड, बालाजी उर्फ बाळासाब डांगे,शिवहार मठपती महाराज, प्रा.विजय भिसे,दत्ता पा.घोरबांड, शेषेराव पाटील काळम, शेकापूरे ,अंगुलीमाल सोनसळे,गंगाधर भिसे,माधव काळम, तेलंगवाडी येथील तंटामुक्त अध्यक्ष सिताराम दासरे, गोविंद पोटजळे ( सदस्य ), गोविंद तांडा येथील पालक पंडित राठोड,गुलाबराव जाधव,चव्हाण, साईनाथ केत्ते शिराढोण, पत्रकार तथा शिक्षक देविदास डांगे, माणिक भिसे,लक्ष्मण कांबळे यांच्यासह पालक,प्रतिष्ठित नागरिक व आजी माझी विद्यार्थी यांची उपस्थितिती होती. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रयतेचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज, विद्येची देवता सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा ,लोकनेते कै. माधवराव पाटील पांडागळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर शाळेच्या वतीने मान्यवरांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.प्रथम शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे स्वागत गीत गाऊन स्वागत केले त्यानंतर मनमंदिररा शंभोला पुजीते या बहारदार नृत्य गीताने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.ह्यानंतर ५ वी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शिवाजीमहाराज यांचे गीते ,देशभक्तीपर गिते ,बंजारा गीते,हिंदी गिते,मराठी गिते,मराठी लावणी अशा अनेक नृत्य गीतांची श्रोत्यांना मैजवानी दिली यामध्ये ढोलकिच्या तालावर या लावणी घेवून आलेल्या लहान विद्यार्थ्यांच्या नृत्यास श्रोत्याने टाळ्याच्या कडकडाटासह कौतुक केले , काठीन घोंगड घेवूद्या कीर …. अशा अनेक गितांना श्रोत्यानी टाळया वाजवून साद दिली. अशा अनेक गीतनृत्यावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.ह्यानंतर मोबाईलमुळे दुष्परिणाम कसे होतात हे लघू नाट्याचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले ह्यामध्ये फेसबुक, ईष्टग्राम,गुगल,टिकटाॅक ,व्हाटसप यांच्या आहारी गेल्यामुळे आई वडील मुलावर लक्षदेत नाहीत तर त्याचे पाहून मुलेही मोबाईलच्या आहारी गेले आहेत त्याचा अभ्यासामधी कशी अधोगती होते व दुष्परिणाम कसे होतात ते नाटीकेतून दाखविण्यात आले आहे,या बाल कलाकारांना मुख्याध्यापक शिवसांब कोरे यांच्या मार्गदर्शनानुसार रात्रंदिवस मेहनत घेऊन नृत्य मार्गदर्शन करणारे शिक्षक भगवान जाधव , विठ्ठल चिवडे, दौलत पांडागळे,सुनिल जमदाडे ,पठाण रहेमान, सुरेखा डांगे मॅडम, धानोरकर बी,अन्नमवाड मनिषा मॅडम, सविता शेटकर मॅडम, बालू पांडागळे , हानुमान घोरबाड आदिनी परिश्रम घेतले .या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन शिक्षक भगवान जाधव व विठ्ठल चिवडे ( शिक्षक तथा पत्रकार ) यांच्या सुरेख वाणीतून केले.ह्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गिताने केला.
हा कार्यक्रम पहाण्यासाठी उस्माननगर ,तेलंवाडी,शिराढोण, गोविंद तांडा येथील पालकांची व महिला,पुरुष ,तरूणांची उपस्थितिती होती सर्व बाल कलाकारांचे टाळ्या वाजवून कौतूक करण्यात आले.