दैनिक चालू वार्ता
पैठण प्रतिनिधी गजानन ठोके
राज्यात यंदा दुष्काळ पडल्याने बरेच अल्पभूधारक शेतकरी व बरेच शेत मजूर व ऊस तोडी करणारे मजूर यंदा गावाकडे काम नसल्यामुळे ऊस तोडी साठी राज्यात व कर्नाटक राज्यात गेलेले आहे यंदा कारखान्याचा गळीत हंगाम लवकर सुरू झाल्याने व अल्प पावसामुळे यंदा लवकरच संपत आला आहे काही ठिकाणी कारखान्याचा हंगाम संपला असून तेथील ऊस वाहतूक करणारे ऊसतोड कामगार मुकादम आपल्या टोळ्या सह आपापल्या गावी परतत असल्याचे चित्र पैठण तालुक्यात पहावयास मिळत आहे
पैठण सह पैठण तालुक्यातील ग्रामीण भागातील ऊस तोडी करणारे मुकादम उसाची वाहतूक करणारे वाहतूकदार व ऊस तोडी करणारे मजूर हाताला काम मिळावे व वर्षभराची मजुरी सहा महिन्यातच मिळते म्हणून ऊस तोडी साठी आपल्या राज्यातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर व कर्नाटक राज्यातील काही साखर कारखान्यावर मोठ्या प्रमाणात जात असतात नोव्हेंबर महिन्यापासून गाव सोडून गेलेले हे मजूर व मुकादम वेगवेगळ्या ठिकाणी ऊस तोडी करत असतात मार्च व एप्रिल महिन्यात हे मजूर गावी परतत असतात यंदाही एक महिना आधीच हंगाम संपल्याने हे सर्व लोक आपापल्या गावी परतत आहेत अशातच पैठण तालुक्यातील मौजे कोळी बोडखा येथील मुकादम व वाहतूकदार श्री शहाजी मगरे, रवी पांढरे, राहुल हातागळे हे आपल्या वाहन व मजुरांसह बुधवारी गावी पोहोचले यंदाचा हंगाम सुखरूप व निर्विघ्न पार पाडून गावी परतल्याने त्यांनी बँड वाजवून गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला यंदा कमी दिवसात चांगली मजुरी मिळाल्याने ऊसतोड कामगार ही चांगलेच खुश दिसत होते त्यांनीही बँडच्या तालात नाचत जल्लोष व्यक्त केला सर्व मजूर गावी सुखरूप पोहोचल्याने गावकऱ्यांनीही त्यांचे स्वागत केले…