दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/वाघलवाडा :- नायगाव मतदार संघांचे लोकप्रिय शेतकरी नेते तथा उद्योगरत्न मा. श्री मारोतराव पाटील कवळे गुरुजी संस्थापक अध्यक्ष व्ही.पी.के उद्योग समूह यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या डा.शंकरराव चव्हाण जागरी कुसुमनगर, वाघलवाडा. कारखान्याचे दि २८/०२/२०२४ रोजी २ लाख में. टन (उसाचे गाळप )यशस्वी रित्या पूर्ण केल्या बद्दल कवळे गुरूजी यांनी अभिनंदन केले आहे.या सर्व व्यवस्थापनामध्ये मा.चेअरमन साहेब, मा. कार्यकारी संचालक साहेब, कारखान्याचे सरव्यवस्थापक, चीफ इंजिनिअर, चीफ केमिष्ट, मुख्य शेतकी अधिकारी, ऊस विकास अधिकारी,ऊस पुरवठा अधिकारी सर्व खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कर्मचारी, कामगार, ऊस तोड ठेकेदार, ऊस वाहतूक ठेकेदार,ऊस तोड कामगार, आणि सर्व शेतकरी, सभासद यांचे व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या सहकार्य केले त्याबद्दल कारखाना प्रशासनातर्फे सर्वांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून पुढील गाळपासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.अशी माहिती भगवान चव्हाण नायगावकर यांनी दिली आहे.