दिव्यांग निधीपासून लाभार्थी वंचित…
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा.दवणे
जालना (मंठा):- दिव्यांग व्यक्तींसाठी २०१२ पासून महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली असून मंठा तालुक्यातील अनेक ग्रामसेवक दिव्यांगाना जाणूनबूजून अनेक ग्रामपंचायतींना दिव्यांगाचा निधी वाटप करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.तर काही ग्रामपंचायतीत या दिव्याग निधीचा गैरप्रकार करीत असल्याच बोललं जात आहे.
तालुक्यातील अनेक ग्रामसेवक दिव्यांगाना जाणूनबूजून निधी वाटप करीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नाचा पाच टक्के निधी हा दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात येतो, परंतु तालुक्यातील काही ग्रामपंचायतीकडून हा निधी अद्यापही वाटप करण्यात आलेला नाही. त्यामुळे दिव्यांगांचा निधी तात्काळ वाटप करावा, अशी मागणी होत आहे.
शासनाकडून ग्रामपंचायतीला येणाऱ्या निधीमधून दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवल्या जातो. तो निधी दिव्यांग बांधवांना ३ डिसेंबर रोजी अपंग दिना मिमित्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाटप केला जातो. परंतू हा निधी अद्याप वाटप झाला नसल्यामुळे दिव्यांगांचा निधी तात्काळ वाटप करावा, अशी मागणी दिव्यांग बांधवाकडून करण्यात येत आहे . तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने दिव्यांगांचा पाच टक्के निधी वाटप करण्यात आला नसून काही ठिकाणी ग्रामसेवकाकडे वार्षिक उत्पन्नाची विचारणा केली असता समाधानकारक माहिती मिळत नाही, तसेच वार्षिक उत्पन्नाच्या कोणत्याही बाबतीतल्या
कागदपत्रांची लेखाजोखा दाखविले जात नाही, कुठलीही योग्य माहिती
लाभार्थ्यांना दिली जात नाही,
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या
अनेक ग्रामसेवकांनी
निधी खर्च केला नाही,
असे असताना ग्रामपंचायतींनी राखीव निधीतून वाटप करण्याची मागणी दिव्यांग नागरिक ग्रामपंचायतकडे करीत आहेत. मंठा तालुक्यात ९२ ग्रामपंचायत अस्तित्वात असून यातील अनेक ग्रामपंचायतीने अपंगांना निधीचे वाटप केले नसल्याचे सांगितले जाते या संदर्भात कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी संतोष गगनबोने हे निधी वाटप केली नाही अशा ग्रामपंचायतीवर व अधिकारी यांच्यावर काय कार्यवाही करतील आणि अपंगांना न्याय देती अशी आशा दिव्यांग लाभार्थी बाळगून आहेत.
ग्रा.पं. च्या निष्काळजीपणामुळे निधी वाटपाचे काम रखडले…
शासनाकडून दिव्यांग बांधवांसाठी ग्रामपंचायतीला येणाऱ्या निधीमधून पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांसाठी राखीव ठेवल्या जातो, तो निधी दिव्यांग बांधवांना वाटप केल्या जातो. ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांचा समन्वय होत नसल्याने अनेक ग्रामपंचायतीने दिव्यांग बांधवांचा निधी वाटप केला नाही त्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
रवींद्र अंभोरे , प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना जालना जिल्हा संपर्क प्रमुख