दै चालु वार्ता वृत्तसेवा
नागपूर :गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील धरणे बऱ्यापैकी भरलेली आहेत. भारतीय हवामान विभागाने पुढील २ दिवस विदर्भामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे.गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील धरणे बऱ्यापैकी भरलेली आहेत. भारतीय हवामान विभागाने पुढील २ दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. विदर्भवासिय आणि नागपूरकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. नागपूर जिल्ह्यातील धरणं भरली असल्यामुळे पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो.त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नदी शेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नदी किनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर धोकादायक ठिकाणं किंवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका, असं आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय.