दै चालु वार्ता वृत्तसेवा/
मुंबई : नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे. महाविकास आघाडी एकत्र येऊन फडणवीस सरकारच्या काळातील फायली बाहेर काढणार आहे. तशी वेळच आता आली आहे, असं पटोले म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या रस्ते घोटाळ्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पाटील यांनी स्वत: खाल्ले. पण दिसून आले नाही. किती खाल्ले ते त्यांनी सांगून जावे, असंही ते म्हणाले.
भाजप नेत्यांनी आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे काढण्यास सुरुवात केल्याने आघाडी सरकारचे अनेक मंत्री अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता आघाडी सरकारनेही भाजप विरोधात वात पेटवण्याचा निर्णय घेतला आहे.तसा इशाराच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार आहोत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
भाजप लोकांची दिशाभूल करत आहेत. लोकांचं प्रश्न सोडवत नाही. केंद्र सरकारवर जनतेची नाराजी आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपची नौटंकी सुरू आहे. म्हणूनच किरीट सोमय्या स्टंट करत आहेत. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचं काम भाजप करत आहेत, असं सांगतानाच काँग्रेस चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला गांभीर्याने घेत नाही. तसेच आमच्या मंत्र्यांची चूक नसल्याने आम्हाला घाबरण्याचं कारणही नाही, असं ते म्हणाले.तसेंच
मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या कार्यक्रमात विरोधकांना भावी सहकारी म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. एखाद्या गोष्टीची गंमत करणं, जोक करणं हा मुख्यमंत्र्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांनी गंमतीत ते विधान केलं असावं, असं ते यावेळी म्हणाले.