दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नवी दिल्ली : देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. ही वाढ पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयानेही खबरदारी घेतली आहे.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने आता परिसरात मास्क घालणे, शारिरीक अंतर राखणे आणि स्वच्छतेचं पालन करणे अनिवार्य केलं आहे. तात्काळ या नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
दरम्यान, वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता केंद्राने सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे. तसंच परिस्थितीवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून आरोग्य यंत्रणांचे मॉक ड्रील्सही घेण्यात आले आहेत.