दैनिक चालु वार्ता चाकूर प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी येथील शेळीपालक विठ्ठल शेषराव वागलगावे यांच्या दोन शेळ्या व एका बोकडावर विज पडून मृत्यू झाला.दि.27 एप्रिल रोजी विठ्ठल वागलगावे व त्यांची पत्नी शकुंतला वागलगावे हे दोघे पती – पत्नी शेगळगाव शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेले असता सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस येऊन विजाचा कडकडाट सुरू झाला.व जोराचा पाऊस येऊ लागल्याने त्यांनी शेळ्या गावाकडे घेऊन जाण्यासाठी नेघाले असता विजांचा जोरात कडकडाट होऊन तेथील शेळ्यावर विज कोसळली.यात त्यांच्या दोन शेळ्या व एक बोकड विज पडून जागीच ठार झाले ज्याची किंमत दोन शेळ्या 30 हजार व एक बोकड 20 हजार असे एकूण पन्नास हजार रूपयांचे नुकसान झाले आहे व यात ही विज कोसळल्याने तेथे जवळच असलेल्या शेळीपालक शकुंतला वागलगावे यांच्या पाठीला जखम झाली आहे.यात ती महीला विज पडताच बेशुध्द होऊन पडली तिच्या पतीने व तेथील नागरीकांनु शकुंतला यांना एका खाजगी वाहणाने पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे.यात या शेळी पालकाचे मोठे नुकसान झाले असुन त्याचबरोबर विज पडून पत्नीही जखमी झाल्याने विठ्ठल वागलगावे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
विठ्ठल वागलगावे यांची हलाकीची परीस्थीती असल्याने दोन मुले व कुटुंबाची उपजीवीका भागवण्यासाठी खाजगी सावकाराकडून पैसे घेऊन शेळ्या विकत घेऊन दोघे पती – पत्नी शेळगाव,राचन्नावाडी,संगाचीवाडी,सांडोळ शिवारात शेळ्या राखतात मात्र निसर्गाने घाला घालून अवकाळी पावसाने विज पडल्याने दोन शेळ्या व एक बोकड जागीच दगावले व सावलीसारखी साथ देणार्या पत्नीला विजेची आग लागल्याने यात तीही जखमी झाल्यामुळे विठ्ठल वागलगावे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.या कुटुंबाचे निसर्गाच्या अवकर्पेमुळे मोठे अर्थीक नुकसान झाले असून प्रशासनानी या कुटुंबास तात्काळ मदत करावी अशी मागणी होत आहे.या घटनेची माहिती मिळताच तलाठी दत्तात्रेय तेली,पशुवैद्यकीय अधीकारी शशिकांत शिंदे यांनी तात्काळ भेट देऊन पंचनामा केला.यावेळी राचन्नावाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक जनार्धन साबदे,शेळगाव ग्राम पंचायतचे ग्रामसेवक विठ्ठल घुगे,माजी सरपंच साधू वागलगावे,माजी उपसरपंच ज्ञानोबा नंदगावे,रामेश्वर गाडेकर डिगांबर म्हेत्रे आदींच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.विज पडून अर्थीक नुकसान झाल्याने शेळीपालक विठ्ठल वागलगावे यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी प्रशासनाकडे मागणी केली आहे