दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश नामदेव माने
औरंगाबाद, दि. 1 – मी लाऊडस्पिकरचा विषय अचानक काढला नाही. माझ्या आधी अनेकांनी भोंग्याचा विषय मांडला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की लाऊडस्पिकर हा धार्मिक नाही तर सामाजिक विषय आहे. उत्तर प्रदेशमध्ये जर मशिदीवरचे लाऊडस्पिकर उतरले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही. भोग्यांना धार्मिक रंग दिला तर आम्हीही तसंच उत्तर देऊ. मला कोणीतरी सांगितलं की संभाजीनगरमध्ये 600 मशिदी आहेत. बांगेची कॉन्सर्ट चालते का ? रस्त्यावर नमाज पढण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला ? 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही. 4 तारखेनंतर दुप्पट आवाजात मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवू याचा पुनरुच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादेत केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाली. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले होते. राज्यभरातील मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सभेला आले होते. रखरखत्या उन्हात प्रवास करून कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने राज ठाकरे यांना ऐकायला आले होते. मैदान खचाखच भरले होते. मैदानाबाहेरही गर्दी होती. जवळपास 3 हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
राज ठाकरे म्हणाले की, मला कल्पना आहे की बसायला सोडा पण उभं रहायलासुद्धा जागा नाही. मुंबईला गुढीपाडव्याला सभा घेतली. त्यानंतर अनेकांनी बडबड सुरु केली. त्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी ठाण्याला उत्तर सभा घेतली. या दोन सभानंतर किती बोलताहेत असा टोलाही राज यांनी सत्ताधार्यांना लगावला. राज ठाकरे म्हणाले की, संभाजीनगरला सभा घेण्याचे ठरले. केवळ संभाजीनगरच नाही तर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातही सभा घेणार आहे. विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातही सभा घेणार आहे. या सभांना आडकाठी आणून काही फायदा नाही. कोबंडा झाकला तरी सूर्य उगवतोच. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न आहे. संभाजीनगरात तर दहा दिवसांनी पिण्याचं पाणी येतं. सगळेच प्रश्न प्रलंबित आहे. पण आजचे जे काही प्रमुख विषय आहेत त्याला धरून मी बोलणार आहे.
महाराष्ट्र दिन समजून घेताना आपल्याला महाराष्ट्र समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे इतिहास समजून घेतला पाहिजे. ज्याचा इतिहास विसरला त्याचा भूगोल सटकला. खिलजी आला तेंव्हा किल्ल्यात फितुरी झाली होती. खिलजी सैन्य घेऊन आला ही त्या काळची पहेली फेक न्यूज होती. रामदेवरायची कन्या खिलजी पळवून घेऊन गेला. पुढचे 400 वर्षे मातांवर अन्याय झाला. छत्रपतींचा जन्म झाला अन् महाराष्ट्राच दार उघडलं. स्वाभिमानानं कसं जगायचं हे आमच्या राजानं शिकवलं. केवळ 50 वर्षांच्या आयुष्यात महाराजांनी भव्य काम केलं. 27 वर्ष औरंगजेब इथं राहिला आणि इथेच मेला. छत्रपती संभाजी राजे, ताराराणी साहेब त्यांच्या विरोधात लढले. औरंगजेबाच्या पत्रात केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेखआहे. औरंगाजेबालाही कळलं होतं शिवाजी महाराज व्यक्ती नाही तर विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचं भूत जेंव्हा लोकांमध्ये येईल तेंव्हा आपण जग पदाक्रांत करू. आंबेडकरांनी तसा विचार बोलून दाखवला होता. आपण फक्त महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी साजरी करतोय, असंही राज ठाकरे यांनी सुनावलं.
माझ्या दोन सभा झाल्या तर सगळे फडफडायला लागले. पवार म्हणाले की हे दोन समाजात दुही माजवताय. पवार नास्तिक आहे असं मी बोललं तर ते त्यांना झोंबलं. तुमची कन्याच सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या की ते नास्तिक आहेत. आता तुम्हीच नाटकं करताहेत पुजेचं. मी आजोबीची सगळी पुस्तके वाचली तुम्ही मला सांगू नका. नवरात्रोत्सव सुरु करणारे माझे आजोबाच होते. उठ मराठ्या उठ हे पुस्तक पवारांनी वाचावं. यासह राज ठाकरे यांनी पुस्तकांची नावं वाचून दाखवली व पवारांनी ही पुस्तकं वाचावी अस आवाहन केल.
आपल्याला जेवढं पाहिजे तेवढच वाचू नये. मी जे सांगितलं ना की राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला. पवारांनी जेम्स लेनवरून बाबासाहेब पुरंदरे यांना त्रास दिला. इंडिया टुडेने जेम्स लेनची मुलाखत घेतली. त्यातली जेम्स लेनची 4 उत्तरे वाचा, असंही राज यांनी शरद पवार यांना सुनावलं. जेम्स लेनला सत्ता असताना खेचून का आणलं नाही. तुम्ही केंद्रात मंत्री होता मग जेम्स लेनला फरपटत का आणलं नाही. तुम्ही लोकांना विष का पाजताय असा सवालही राज ठाकरे यांनी शरद पवारांना केला. रामदास स्वामीबद्दलही असाच वाद उकरून काढला गेला. राजकीय फायद्यासाठी असे वाद उकरून काढण्यात आले. या जातीपातीच्या विषापासून सर्वांनी दूर राहण्याची गरज आहे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.
मुळात शरद पवारांना हिंदू या शब्दाची अँलर्जी आहे. शरद पवारांकडून जातीभेद करण्यात आला. पुजेचे फोटो टाकून पवार नाटक करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव शरद पवार कधी घेत नाही. पवारांनी जातीजातीत विष कालवलं. तुम्ही कालवलेलं विष आता शाळा कॉलेजापर्यंत पोहचलं आहे. उदात्त विचार देणारा महाराष्ट्र जातीत सडतोय. आम्ही जातीतून बाहेर आलो नाही तर हिंदु कधी होणार, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
मी लाऊडस्पिकरचा विषय अचानक काढला नाही. माझ्या आधी अनेकांनी भोंग्याचा विषय मांडला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की लाऊडस्पिकर हा धार्मिक नाही तर सामाजिक विषय आहे. उत्तर प्रदेशमध्ये जर मशिदीवरचे लाऊडस्पिकर उतरले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही. भोग्यांना धार्मिक रंग दिला तर आम्हीही तसंच उत्तर देऊ. मला कोणीतरी सांगितलं की संभाजीनगरमध्ये 600 मशिदी आहेत. बांगेची कॉन्सर्ट चालते का
रस्त्यावर नमाज पढण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला. 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही. 4 तारखेनंतर दुप्पट आवाजात मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवू.
सभा सुरु असताना अजानचा आवाज आला. त्यामुळे राज ठाकरे यांनी पोलिसांना नम्र विनंती केली की ही आजान तातडीने बंद करा. दरम्यान, यांना प्रमानं समजून सांगा. जर सरळ मार्गानं समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटातली ताकद दाखवू, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.