दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
राज्यात 2 ते 3 दिवस मान्सूनचा मुक्काम वाढला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन वेगवेगळे हवेच्या कमी •दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. दोन्ही ठिकाणी हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होतं असल्याने याचा मान्सूनवर परिणाम झाला आहे. आज राज्यातील 22 जिल्ह्यांना हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने आज नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, बुलडाणा, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 22 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. काल अकोल्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शनिवारी केरळात धुव्वाधार पाऊस कोसळला आहे. यामुळे केरळमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Top 10 viral news