दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
किल्ले धारूर (रिपोर्टर ): तालुक्यातील पहाडी दहिफळ येथील ग्रामस्थांना नदीपात्र च्या दुसऱ्या बाजूला असलेली शेती करण्यासाठी मोठा अडथळा येत आहे. आमचा नदीपात्रातून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी पुंडलिका नदीपात्रात जल आंदोलन करण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी तीन तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
धारूर तालुक्यातील पहाडी दहिफळ येथील शेतकन्यांची जमीन ही कुंडलिका नदीमुळे दोन विभागात विभागलेली आहे पन्नास टवेपेक्षा अधिक ग्रामस्थांची शेती ही कुंडलिका नदीच्या उत्तर बाजूस आहे. या नदीवर मागील दोन वर्षापूर्वी सोना खोटा धरण बांधण्यात आलेले आहे धरण भरल्यास अचानक नदीपात्रात पाणी सोडण्यात येते. पात्रात पाणी
सोडल्यामुळे केव्हाही नदीला पूर येतो पहाडी दहिफळ येथील ग्रामस्थ शेती कसण्यासाठी नदीपात्रातून नेहमी ये-जा करतात तसेच गावांतर्गत धनगर वस्ती नदीपात्राच्या उत्तरेस आहे. येथे १०० च्या जवळ पास लोकवस्ती आहे. वस्ती वरील ग्रामस्थांना रेशन तसेच शाळा यासह विविध कारणासाठी नदी ओलांडून गावांमध्ये या वे लागते. तसेच गावातील नागरिकांना शेती कसण्यासाठी नदी ओलांडून शेतात जावे लागते. परंतु नदीला येणाऱ्या अचानक पुरामुळे तसेच अधिकच्या पाण्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महिलांना नदी ओलांडताना जीव मुठीत धरून चालावे लागते येथील प्रश्न कोल्हापुरी बंधारा बांधून मार्गी लावावा यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा जिल्हाधिकारी तसेच संबंधित पाटबंधारे विभागाला निवेदने देण्यात आली होती. या प्रश्नासाठीपाटबंधारे विभागाकळून नदीपात्रात कोल्हापुरी बंधारा बांधून त्यावर रस्ता तयार करून ग्रामस्थांचा प्रश्न सोडवण्यासाठी गतवर्षी सर्वेक्षणही करण्यात आले होते. परंतु अद्याप या रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे धनगर वस्ती तसेच पहाडी दहिफळ येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजण्या दरम्यान नदीपात्रामध्ये जल आंदोलन करण्यात आले. यावेळी ३० ते ४० ग्रामस्थ पाण्यामध्ये तीन तास बसून होते. नंतर धारूर तहसील येथील मंडळ अधिकारी श्री वाघमारे व तलाठी श्रीमती आलुरे यांनी जाऊन ग्रामस्थांची समजूत काढली संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनाही दूरध्वनीवरून संपर्क साधून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांची बोलणे करून दिल्यानंतर जन आंदोलन मागे घेण्यात आले मात्र ग्रामस्थांनी पाण्यामध्ये जनआंदोलन सुरू केल्यानंतरही संबंधीत पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र फिरकले नव्हते.