दैनिक चालू वार्ता गंगापुर प्रतिनिधी -सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर तालुक्यातील गाव खेड्याची जीवन वाहिनी समजले जाणारे ग्रामीण रस्ते यांची अवस्था अत्यंत बिकट आहे त्यातच,
भिवधानोरा धनगरपट्टी रस्त्याची अवस्था गेल्या दोन वर्षा पासून अत्यंत दैनिय झाली आहे.दुरुस्ती निधी मधून चार की मी साठी ८५ लाख मंजूर असून ही अधिकाऱ्यांच्या बेजावब्दार पणामुळे तीन गावातील नागरिकांना विदयार्थ्यांना शेतकऱ्यांना रस्त्याच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.वेळोवेळी मागणी करून आंदोलने करून ही प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही.
या रस्त्यावर अपघात व्होउन अनेक लोकांना गंभीर इजा झाली आहे.पावसाळ्या पूर्वी भिवधानोरा धनगरपट्टी रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा दफन आंदोलन करण्यात येणार असल्याचे इशारा शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके यांनी कार्यकारी अभियंता औरंगाबाद यांना दिला आहे.
भिवधानोरा-अगर वाडगाव-गळणीम्ब या तिन्ही गावातील शेतकऱ्यांना रस्ता खराब असल्याने रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता समजायला मार्ग नाही त्यामुळे अनेक वेळा अपघात झाले आहे.धनगरपट्टी येथून शेकडो विद्यार्थी यांना भिवधानोरा येथे शाळेत जावे लागत आहे.पाऊस पडल्यावर पूर्ण रस्त्यावर पाणी साचलेले असते त्यामुळे येण्याजाण्याचा मार्ग पूर्ण बंद व्होउन जातो.रस्त्यावर शेतातील पाणी जाण्यासाठी छोटे पूल यांना ही मोठाले भगदाड पडले असल्याने त्यात वाहनाचे चाके जाऊन अपघात झाले,दोन पूल वाहून गेले तेथे मातीचा भराव टाकून तात्पुरती वेवस्था केली आहे.
प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन काम चालू करावे अशी मागणी निवेदनात केली आहे..
प्रतिक्रिया
वातानुकूलित शहरात राहून ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना,गेंड्याची कातडी पांघरलेला प्रशासनाला शब्दाची भाषा कळत नसेल तर आम्हाला स्वतः ला मातीत गाडून घेतल्याशिवाय आता पर्याय उरला नाही.
भाऊसाहेब शेळके पाटील
प्रहार शेतकरी संघटना औरंगाबाद