दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या चौ
थ्या लाटेची भीती वाढताना दिसत आहे. अशातच रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दिवसेंदिवस देशाच्या विविध भागात पुन्हा कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. मात्र, देशात पुन्हा वाढणाऱ्या कोरोनाचा वेग चिंतेचा विषय बनला आहे.
कोरोनाची चौथी लाट रोखण्यासाठी सरकार जलद लसीकरणावर काम करत आहे, तसेच लोकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगत आहे.
गेल्या 24 तासांत, भारतात कोरोना विषाणूची 2,022 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि 46 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान 2,099 लोकांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी ताजी आकडेवारी जाहीर केली. देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 24 हजार 459 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्याच वेळी, सक्रिय प्रकरणांची संख्या 14 हजार 832 पर्यंत कमी झाली आहे. एकूण संसर्गाच्या 0.03 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 0.69 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 25 लाख 99 हजार 102 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.