दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- पावसाळ्या अगोदर अंजनगाव सुर्जी शहरी भागातील रखडलेली कामे पूर्ववत व्हावे करिता वीज वितरण कंपनी अंजनगाव सुर्जी यांना तसेच नागरिकांच्या प्रश्नांना व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकार सुनील माकोडे व पत्रकार श्रीकांत नाथे यांनी ही बाब लक्षात घेतली.याअगोदर सुद्धा माजी नगरसेवक सचिन गावंडे,दीपक दानेज व गजानन श्रीरामजी फुसे यांनी वीज वितरण कंपनीला लेखी तक्रार केली होती परंतु वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शहरातील कामे प्रलंबीत आहेत.
सद्यस्थितीत पावसाळा तोंडावर येत असतांना अंजनगाव सुर्जी शहरी भागातील विजेच्या तारा पूर्णपणे खाली आल्यामुळे नागरिकांच्या जीवास कधीही धोका उद्भवू शकतो.ह्यामुळे होणारी जिवीत हानी टाळण्यासाठी वीज वितरण कंपनी अंजनगाव सुर्जी यांनी संबंधित विषयी तात्काळ प्रश्न निकाली काढावा.पूर्ववत न झाल्यास वीज वितरण कंपनी अंजनगाव सुर्जी होणाऱ्या घटनेस जबाबदार राहील असे यावेळी पत्रकार सुनिल माकोडे व पत्रकार श्रीकांत नाथे यांनी संबंधितांना म्हटले.
जनतेच्या हिताची बाब लक्षात घेता संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत चर्चा झाली असता लवकरात-लवकर वीज वितरण कंपनी संबधी कामे पूर्ववत करू असेही यावेळी सांगण्यात आले.