दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम :महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य संघ व शंकरराव पाटील महाविद्यालय भूमच्य विद्यमाने उस्मानाबाद जिल्हा मराठी साहित्य संघाचे पहिले संमेलन भूम येथे संपन्न झाले .
मंगळवार दिनांक 31 मे २०२२ रोजी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने शंकरराव पाटील महाविद्यालय भूम येथे आयोजित केलेल्या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री हणमंत पडवळ उपस्थित होते . तर उद्घाटक म्हणून उस्मानाबाद बीड लातूर नांदेड जिल्ह्याचे विभागीय उपसंचालक माहिती अधिकारी यशवंत भंडारे साहेब उपस्थित होते .
या शिवाय प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ साहित्यिक जी एस कुचेकर पाटील पुणे . सौ अनुपमा रामचंद्र भंडारी गट शिक्षण अधिकारी तथा ज्येष्ठ साहित्यिका लातूर . कवयित्री सौ सरिता कलढोणे जुन्नर पुणे . परशुराम नागरगोजे अहमदनगर . सुरेश मंत्री अंबाजोगाई . सुरेश तळेकर . संतराम जोगदंड गेवराई . भानुदास धोत्रे परभणी . ओमप्रकाश कांबिलकर औरंगाबाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस बी चंदनशिव . प्राचार्य शाहू बोराडे सहअसंख्य जेष्ठ साहित्यिक 9 जिल्ह्यातून उपस्थित होते .
या साहित्य संमेलनमध्ये ज्येष्ठ साहित्यिक जी एस कुचेकर पाटील पुणे यांच्या दोन कथासंग्रहाचे . परशुराम नागरगोजे अहमदनगर यांच्या कथा संग्रहाचे व कवयित्री सौ सरिता कलढोणे जुन्नर यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले .
महत्त्वाची बाब म्हणजे . राजकीय लोक प्रतिनिधींच्या सहभागा शिवाय या यशस्वी झालेल्या कवी संमेलनात विविध साहित्यकारांचे लेख संमेलनाच्या दिवशी पूर्णपणे चार पानाचे लेख दैनिक संघर्षमध्ये संपादक संतोषजी हंबीरे साहेब यांनी प्रसिद्धीस देऊन संमेलनाला फार मोठा आधार देण्याचं काम केलं . या निमित्ताने दैनिक संघर्ष या वर्तमानपत्राचे देखील उपस्थित सर्वांनी कौतुक करून प्रकाशन केले .
या संमेलनामधे ज्या साहित्यकारांनी वेळेची मर्यादा पाळून सादरीकरण केले . यामध्ये कथा . कवीता . गझल . लावणी या सर्व साहित्याचे मूल्यांकन उपस्थित परीक्षकांनी केले . यातून आलेल्या प्रथम . द्वितीय .तृतीय व उत्तेजनार्थ अश्या एकूण सहा साहित्यिकांना सन्मानचिन्ह देऊन उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . यामध्ये प्रथम जी डी गरड . द्वितीय प्रा . अरुण गाढवे . तृतीय मधुकर बाबुराव हुजरे . उत्तेजनार्थ शुभांगी रवींद्र मस्के . अर्चना अंभोरे उस्मानाबाद . श्यामभुवन नवले यांचा समावेश आहे .
तसेच याच कार्यक्रमामध्ये कला केंद्रातील व ऊसतोड मजूर यांच्या लहान मुलांचे संगोपन करणाऱ्या खुशी ग्राम फाउंडेशन लातूरचे मधुकर सोनवणे तसेच ज्येष्ठ वृद्ध यांचे वृद्धाश्रमाच्या माध्यमातून संगोपन करून कल्याणकारी कार्य करणारे ह.भ.प. गहिनीनाथ लोखंडे महाराज तसेच आदिवासी पारधी समाजातील कीर्तनकार हभप अरुण बाजीराव काळे महाराज यांनीही उत्कृष्ट प्रबोधन केल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक सिंधुताई सपकाळ यांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह देऊन उपस्थितांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
संमेलनास रवींद्र विक्रम ढगे .चित्रपट अभिनेते व मालिका कलाकार – प्रेम लागी जीवा, जिद्दारी ‘झोंबीवली या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका तसेच अगं बाई, सासु बाई, काय घडलं त्या रात्री, स्वराज्य जननी जिजामाता, सहकुटुंब सहपरिवार, बाळू मामाच्या नावान चांग भलं, नवनाथ यासारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेले प्रमुख कलाकार देखील उपस्थित होते .
या संमेलनासाठी मुख्य संयोजक पत्रकार शंकर खामकर . प्रा . जी .यु तिजारे . प्रा . डॉ सौ राजश्री . तावरे . प्रा . सौ अलका सपकाळ . प्राध्यापिका सौ पुनम सुतार प्रा . डॉ . जे .पी मंडोत . प्रा . डॉ सौ अनुराधा जगदाळे . दस्तगीर पठाण .शंकर माळी .प्रा . जी एच सूरवसे . प्रा . डी एस साठे मुख्याध्यापक तात्या कांबळे . अलीम शेखसर कु . निकिता अवताडे गोरमाळा . प्राचार्य डॉ . एस बी चंदनशिव यांचेसह महाविद्यालयातील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले .